राज्यात पुढील चार-पाच दिवस पावसाचा जोर कायम

Share

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात घाट माथ्यावर पावसाची धुवाँधार चालू आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

मुंबई शहरात पावसाच्या काही सरी बरसत आहे, उपनगर व सभोवतालच्या नवी मुंबई, ठाणे, उरण-पनवेल भागात पावसाची संततधार चालू आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची नोंद झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जोरदार सरींमुळे महाबळेश्वर आणि वर्धा येथे १०० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

आतापर्यंत सांताक्रुझ केंद्राने सरासरी १०११ मिमी आणि कुलाबा केंद्राने सरासरी १०१५ मिमी, ठाणे, बेलापूर १०४६ मिमी तर रत्नागिरी १४१० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सध्या गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत समांतर हवेचा कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यात मान्सूनचा दक्षिणेकडे सरकलेला आस, कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याचबरोबर राज्यावर पूर्व पश्चिमी दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्याचे जोड या सर्व स्थितीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.

परिणामी येत्या बुधवारपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. घाट परिसरात ही पावसाच्या दमदार हजेरीमुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

Recent Posts

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

13 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

38 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

2 hours ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

3 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

3 hours ago