नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यजमान इंग्लंडला शनिवारी त्यांच्याच भूमीत मालिकेतील दुसरा टी-२० सामना पराभूत करून भारताने मालिकाही खिशात घातली. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहितने या सामन्यात केवळ ३१ धावा केल्या असल्या तरी टी-२० क्रिकेटमध्ये ३०० चौकार मारणारा रोहित पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
शनिवारच्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने २० चेंडूंत ३१ धावा तडकावल्या. त्याने ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. ३ चौकारांच्या मदतीने रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये ३०० चौकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. भारताकडून अद्याप कोणीच अशी कामगिरी केली नसल्याने हा रेकॉर्ड करणारा रोहित पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
भारतीय संघ सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. शनिवारी या मालिकेतील दुसरा टी-२० सामना झाला. हा सामना जिंकत भारताने मालिकाही आपल्या खिशात घातली. बर्मिंगहमच्या एजबेस्टन मैदानात हा सामना पार पडला.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…