श्रीसंत करणार नऊ वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लेजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामाला येत्या २० सप्टेंबर रोजी सुरुवात होणार आहे. या लीगचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. यावेळी चार संघात ही स्पर्धा रंगणार आहे. या लीगच्या दुसऱ्या हंगामात वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, युसूफ पठाण, मुथय्या मुरलीधरन, मॉन्टी पानेसर, प्रवीण तांबे, नमन ओझा, एस बद्रीनाथ, स्टुअर्ट बिन्नी, असगर अफगान यांसारखे खेळाडून खेळणार असल्याचे माहिती देण्यात आली होती.


मात्र आता या लीगमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंत, मिस्बाह उल हक आणि केविन ओ ब्रायन यांनीही या हंगामात खेळण्याचे स्पष्ट केले आहे. टी-२० विश्वचषक २०१७ मध्ये श्रीसंतने घातक गोलंदाजी केली. या विश्वचषकात भेदक गोलंदाजी करत अनेक विरोधी संघाच्या फलंदाजाला माघारी धाडले होते. भारताने हा विश्वचषक जिंकला होता.


श्रीसंत गेल्या ९ वर्षांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मात्र लीजेंड्स लीग क्रिकेटमधून मैदानात पुन्हा मैदानात पुनरागमन करत आहे. यावर श्रीसंतने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन करून आनंद होत आहे. या लीगसाठी मी खूप उत्सुक आहे. या हंगामात चांगले प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा करतोय’, असे श्रीसंतने म्हटले आहे.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या