सचिन वाझेचे माफीचा साक्षीदार होण्याचे पत्र ‘ईडी’कडून मान्य

  107

मुंबई : अँटिलीया हाऊस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी दर्शवलेली इच्छा ईडीने मान्य केली आहे. वाझेनी ईडीला दिलेले पत्र ईडीने मान्य केले आहे.


१०० कोटी वसूली, स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सध्या जेलची हवा खात असलेला वाझे हा आता माफीचा साक्षीदार बनला आहे. याआधी वाझेने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज केला होता. वाझेच्या या अर्जावर सीबीआयने देखील संमती दर्शवली होती. मात्र वाझेला खरेच पश्चाताप झालाय की माफीचा साक्षीदार बनून वाझे या गंभीर गुन्ह्यातून आपल्या सुटकेचा मार्ग काढतोय, अशी आता चर्चा सुरु झाली आहे.


त्यानंतर आता ईडीने वाझेचा अर्ज मान्य केल्यानंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळणार असल्याचे दिसते आहे. सचिन वाझे सर्व तथ्य आणि खरी माहिती सांगणार असेल तर माफीचा साक्षीदार होण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही, असे ईडीकडून सांगण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यातील तपासाच्या कोणत्याही टप्प्यावर सचिन वाझे ही माहिती देऊ शकतात, असेही ईडीने म्हटले आहे.


आगामी काळात राज्यात महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. त्यामुळे वाझेबाबत होणारी कारवाई माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अडचणीत आणू शकते. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला फटका बसू शकतो. म्हणूनच ही राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा असल्याच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.

Comments
Add Comment

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)