मुंबई (हिं.स.) : राज्यात आज २७६० नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर पाच कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. आज रोजी एकूण १८६७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज २९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण ७८,३४,७८५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९२% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२३,४५,३२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,०१,४३३ (०९.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.