अध्यक्ष, सरपंच जनतेतून थेट निवडणूकीद्वारे निवडावे – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर (हिं.स.) : राज्यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीतील अध्यक्ष जनतेतून थेट निवडणूकीद्वारे निवडावे तसेच ग्राम पंचायतींचे सरपंच सुध्दा जनतेतुन थेट निवडणूकीद्वारे निवडावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या दोन्ही मागण्या लोकहित जपणा-या असून त्या माध्यमातुन नगरविकास व ग्रामविकासाला योग्य चालना मिळेल असे सांगत लवकरच याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सुधीर मुनगंटीवार यांनी सदर मागण्यांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले व चर्चा केली.


महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यातील विद्यमान तरतूदींनुसार नगरपरिषदेतील व नगरपंचायतीतील निवडून आलेल्या परिषद सदस्यांमधून अध्यक्ष निवडला जात आहे. नगरपरिषद व नगरपंचायतच्या कामकाजामध्ये स्थैर्य प्राप्त होण्याकरिता लोकांमधून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाकरिता थेट निवडणूक घेणारी यंत्रणा पुन्हा अंगीकारणे आवश्यक आहे. नगरपरिषद व नगरपंचायतच्या परिणामकारक कामकाजासाठी आणि विकासासाठी अध्यक्षाचे पद सक्षम करण्याकरिता व निवडून आलेला अध्यक्ष हा आपल्या नगरातील लोकांना थेट जबाबदार असण्याकरिता अध्यक्ष थेट जनतेतुन निवडून येणे आवश्यक आहे. नगरपरिषद व नगरपंचायतच्या सुरळीत कामकाजाची सुनिश्चीती करण्याच्या दृष्टीने तरतूदीमध्ये यथोचितरित्या फेरबदल करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यांमधील तरतूदीमध्ये सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्र. २६ नुसार योग्य त्या सुधारणा करण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत, असे आ. सुधीर मुनगंटीवार या चर्चेदरम्यान म्हणाले.


ग्राम पंचायतीचे सरपंच जनतेतून थेट निवडणूकीद्वारे निवडण्याबाबत महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ याच्या विद्यमान तरतूदीनुसार पंचायतीच्या निवडून दिलेल्या सदस्यांमधून सरपंचांची निवड केली जात आहे. सरपंच पदासाठी निवडणूक लढविणा-या उमेदवारास सदस्यांकडून बहुमत मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, सदस्यांच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांशापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांना अविश्वासाचा प्रस्ताव मांडता येत असल्यामुळे सदस्य वारंवार अविश्वासाचा ठराव मांडतात. त्यामुळे सरपंचाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होवून पंचायतीचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यामध्ये व्यत्यय निर्माण होतो.


पंचायतीच्या कामाकाजामध्ये स्थैर्य प्राप्त होण्याकरिता लोकांमधून ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाकरिता थेट निवडणूक घेणारी यंत्रणा पुन्हा अंगीकारणे आवश्यक आहे. पंचायतीच्या परिणामकारक कामकाजासाठी आणि विकासासाठी सरपंचाचे पद सक्षम करण्याकरिता व निवडून दिलेला सरपंच हा आपल्या गावातील लोकांना थेट जबाबदार असण्याकरिता सरपंच थेट जनतेतुन निवडून येणे आवश्यक आहे. सबब, महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ यांमधील तरतूदीमध्ये सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्र. ५६ नुसार योग्य त्या सुधारणा करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात यावे, असे देखील आ. मुनगंटीवार या चर्चेदरम्यान म्हणाले.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

Nitesh Rane: छत्रपती शिवाजी महाराजांचा ते कधीच आदर करणार नाहीत", नितेश राणे यांची काँग्रेसवर टिका

शिवाजीनगर मेट्रो स्टेशन वादावर नितेश राणे यांनी काँग्रेसला औरंगजेबाचे समर्थक म्हटले मुंबई: कर्नाटक मेट्रो

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

प्रकाश महाजन यांनी दिला मनसेचा राजीनामा, पुढे काय करणार ?

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच मनसेला धक्का बसला आहे. मनसे प्रवक्ते प्रकाश

लग्नाच्या मुद्यावरुन लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना सुनावलं

बीड : लग्नाच्या मुद्यावरुन श्याहण्णव कुळी मराठा, क्षत्रिय आणि गावच्या सरपंचपदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आणि