अध्यक्ष, सरपंच जनतेतून थेट निवडणूकीद्वारे निवडावे – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर (हिं.स.) : राज्यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीतील अध्यक्ष जनतेतून थेट निवडणूकीद्वारे निवडावे तसेच ग्राम पंचायतींचे सरपंच सुध्दा जनतेतुन थेट निवडणूकीद्वारे निवडावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या दोन्ही मागण्या लोकहित जपणा-या असून त्या माध्यमातुन नगरविकास व ग्रामविकासाला योग्य चालना मिळेल असे सांगत लवकरच याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सुधीर मुनगंटीवार यांनी सदर मागण्यांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले व चर्चा केली.


महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यातील विद्यमान तरतूदींनुसार नगरपरिषदेतील व नगरपंचायतीतील निवडून आलेल्या परिषद सदस्यांमधून अध्यक्ष निवडला जात आहे. नगरपरिषद व नगरपंचायतच्या कामकाजामध्ये स्थैर्य प्राप्त होण्याकरिता लोकांमधून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाकरिता थेट निवडणूक घेणारी यंत्रणा पुन्हा अंगीकारणे आवश्यक आहे. नगरपरिषद व नगरपंचायतच्या परिणामकारक कामकाजासाठी आणि विकासासाठी अध्यक्षाचे पद सक्षम करण्याकरिता व निवडून आलेला अध्यक्ष हा आपल्या नगरातील लोकांना थेट जबाबदार असण्याकरिता अध्यक्ष थेट जनतेतुन निवडून येणे आवश्यक आहे. नगरपरिषद व नगरपंचायतच्या सुरळीत कामकाजाची सुनिश्चीती करण्याच्या दृष्टीने तरतूदीमध्ये यथोचितरित्या फेरबदल करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यांमधील तरतूदीमध्ये सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्र. २६ नुसार योग्य त्या सुधारणा करण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत, असे आ. सुधीर मुनगंटीवार या चर्चेदरम्यान म्हणाले.


ग्राम पंचायतीचे सरपंच जनतेतून थेट निवडणूकीद्वारे निवडण्याबाबत महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ याच्या विद्यमान तरतूदीनुसार पंचायतीच्या निवडून दिलेल्या सदस्यांमधून सरपंचांची निवड केली जात आहे. सरपंच पदासाठी निवडणूक लढविणा-या उमेदवारास सदस्यांकडून बहुमत मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, सदस्यांच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांशापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांना अविश्वासाचा प्रस्ताव मांडता येत असल्यामुळे सदस्य वारंवार अविश्वासाचा ठराव मांडतात. त्यामुळे सरपंचाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होवून पंचायतीचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यामध्ये व्यत्यय निर्माण होतो.


पंचायतीच्या कामाकाजामध्ये स्थैर्य प्राप्त होण्याकरिता लोकांमधून ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाकरिता थेट निवडणूक घेणारी यंत्रणा पुन्हा अंगीकारणे आवश्यक आहे. पंचायतीच्या परिणामकारक कामकाजासाठी आणि विकासासाठी सरपंचाचे पद सक्षम करण्याकरिता व निवडून दिलेला सरपंच हा आपल्या गावातील लोकांना थेट जबाबदार असण्याकरिता सरपंच थेट जनतेतुन निवडून येणे आवश्यक आहे. सबब, महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ यांमधील तरतूदीमध्ये सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्र. ५६ नुसार योग्य त्या सुधारणा करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात यावे, असे देखील आ. मुनगंटीवार या चर्चेदरम्यान म्हणाले.

Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

मुंबईत उद्धव समर्थक आणि भाजपचे एकमेकांविरोधात बॅनरयुद्ध

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा विजय झाला. यानंतर भाजपचे मिशन मुंबई लगेच सुरू झाले आहे. बिहारमध्ये

बिहारनंतर पश्चिम बंगालमधील जंगलराज उखडून टाकू!

पंतप्रधान मोदींचे विजयसभेत ‘बंगाल’साठी एल्गार नवी दिल्ली  : काँग्रेसकडे देशासाठी कोणताही सकारात्मक दृष्टिकोन

अरुण गवळींची दुसरी कन्याही राजकारणात

भायखळ्यातून महापालिका निवडणूक लढवणार सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सन

बिहार निकालानंतर महाराष्ट्रात काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा

मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत मुंबई  : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे.