अडीच वर्षांपासून मंत्रालयात नोटा छपाईचा कारखाना सुरू होता

मुंबई : नाशिकमध्ये नोटांचा कारखाना आहे हे पाठ्यपूस्तकात होते; पण गत अडीच वर्षे मविआने मंत्रालयात नोटा छपाईचा कारखाना चालू केला, असे सांगत आघाडी सरकारवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले.​ तसेच अजित पवारांनी आम्हाला भीती दाखवू नये, त्यांच्या आमदारांची काय स्थिती होते ते पाहा, असा टोलाही अजित पवारांना लगावला. उद्धव​​​​​​ ठाकरेंनी त्यांच्याच आमदारांना विष्ठा, वराहची उपमा दिली. हे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली.


मुनगंटीवार म्हणाले, दृष्टांचा संहार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बळ मिळो असे म्हणाले. सत्ता गेल्याच्या वेदना आम्हाला दिसल्या. तुम्ही भाजपशी संधान साधले, पहाटे शपथविधी घेतला अन् पुन्हा महाविकास आघाडीत गेले. तूम्हीही उडी मारली. कधी तरी कुणालाही उडी मारावीच लागती. राष्ट्रवादीत आधी होते आता शिवसेनेत जातात कुणीही संत नसते.


आग लावण्याचे काम करू नका


मुनगंटीवार म्हणाले, कोण कधी येईल तूमच्यासह ते सांगता येत नाही. एक दिवस सत्तेविना राहू शकत नाहीत. माचिस घेऊन आग लावण्याचे काम तूम्ही करीत आहात पण तूम्हाला भाजप समजलीच नाही. ज्यांचे आयूष्य घराणेशाही, वंशवाद यात गेली त्यांना त्याग, सेवा, समर्पण काय कळणार, असा टोलाही अजित पवार यांना मुनगंटीवार यांनी लगावला.


रामाला सोईस्कर वापरता


मुनगंटीवार म्हणाले, तू्म्ही मेवा खायचा आणि कार्यकर्त्यांच्या हाती फक्त झेंडा द्यायचा. महाभारत, रामायण सांगताना विचार करा, असा टोलाही त्यांनी लगावला. तूम्ही कौरव आहात, दुर्योधन-दुशाःसनासोबत कर्ण गेला होता पण तूम्ही सोईस्कर रामाला वापरता आणि वरून ते काल्पनिक पात्र असल्याचे सांगता, असा टोलाही त्यांना लगावला.


काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला​​​


मुनगंटीवार म्हणाले, देवानेही पृथ्वीला वाचवण्यासाठी रामाचा अवतार घेतला होता. आधी तुम्हाला राम नको होता आता जे रामनाम घेतात त्यांच्या मांडीला मांडी लावता, असा टोला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेला त्यांनी लगावला.


उद्धव ठाकरेंवर प्रखर टीका​​


मुनगंटीवार म्हणाले, आमदारांना ठाकरे विष्ठा, वराहची उपमा देत होते, हे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांना शिवसेनेने मंत्री केले अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.


सत्तेसाठी राष्ट्रवादी हपापलेली


मुनगटींवार म्हणाले, अजित पवारांनी आमच्यासोबत शपथ घेतली आता आम्हाला पुढे काय होईल असे सांगत आहेत. आम्ही चिंता करीत नाहीत उलट त्यांनीच आता चिंता करावी, असा टोला लगावत मुनगंटीवार यांनी मविआ एक दिवसही सत्तेविना राहू शकत नाही. जल बिना मछली तसेच सत्ताविना राष्ट्रवादी अशा ढंगात त्यांनी टीका केली. मतांसाठी नव्हे तर सत्यासाठी आम्ही काम करीत असल्याचेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता

महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा

कार्तिकी यात्रेसाठी जादा ११५० एसटी बस सोडणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): बंदा क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक