विजयाच्या स्मृती

  82

पल्लेकेले (वृत्तसंस्था) : रेणुका सिंग, मेघना सिंग, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड या भारताच्या गोलंदाजांनी सोमवारी अप्रतिम सांघिक गोलंदाजी केली. त्यामुळे यजमान श्रीलंकेला ५० षटकांत केवळ १७३ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या भारताच्या स्मृती मन्धाना (नाबाद ९४ धावा) आणि शफाली वर्मा (नाबाद ७१ धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. या विजयामुळे ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसराही सामना जिंकत भारतीय महिला संघाने २-० अशी मालिकाही खिशात घातली आहे.


श्रीलंकेच्या १७४ या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या भारताने दडपण झुगारून फलंदाजी केली. सलामीवीर स्मृती मन्धाना आणि शफाली वर्मा या दोघीही यजमानांच्या गोलंदाजांवर तुटून पडल्या. विजय तर भारताच्या आवाक्यात होताच, पण त्यासाठी भारत किती विकेट गमावतो आणि किती षटकांत हे लक्ष्य पूर्ण करतो? याकडे लक्ष लागले होते. पाहुण्यांच्या सलामीवीरांनी बिनधास्त फलंदाजी करत २५.४ षटकांत १७४ धावांचे लक्ष्य सहज गाठले. त्यात स्मृती मन्धानाने ८३ चेंडूंत नाबाद ९४ धावा तडकवल्या. त्यात ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. शफालीने ७१ चेंडूंत ७१ धावा ठोकल्या. या खेळीत तिने ४ चौकार आणि १ षटकार लगावला.


तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल जिंकत भारताने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. रेणुका सिंग, मेघना सिंग, दीप्ती शर्मा या गोलंदाजांच्या तिकडीने श्रीलंकेच्या फलंदाजीचा कणा मोडला. त्यातून सावरणे श्रीलंकेला शेवटपर्यंत जमले नाही. रेणुकाने ४, तर मेघना आणि दीप्तीने प्रत्येकी २ फलंदाज बाद केले. राजेश्वरी गायकवाडला बळी मिळवता आला नसला तरी तिने आपली १० षटके पूर्ण टाकत अवघ्या २४ धावा दिल्या. धावा वाचविण्यात तिला चांगलेच यश आले. अमा कांचनाने संयमी खेळी खेळत श्रीलंकेतर्फे सर्वाधिक नाबाद ४७ धावा केल्या. भारताच्या रेणुका सिंगला सामनावीर पारितोषिकाने गौरविण्यात आले.

Comments
Add Comment

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,

IND Vs ENG Test Match Day 5: एजबॅस्टन कसोटी सामन्यात पावसामुळे पाचव्या दिवशी खेळण्यास विलंब...

पावसामुळे भारताच्या विजयाच्या आशा धूसर होण्याची शक्यता एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच

राजकारणाची क्रिकेटवर मात

भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका पुढे ढकलली मुंबई : भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता. तिथे

बर्मिंगहॅममध्ये पाचव्या दिवशी काय होणार ?

इंग्लंड ऐतिहासिक कामगिरी करणार की भारत जिंकणार ? भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटींची मालिका सुरू आहे. पहिली

IND vs ENG Test 2 : भारताची विजयाकडे वाटचाल, ६०८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ३ विकेट गमावल्या

एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test 2 Day 4) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन