हिमाचलप्रदेशात बस दरीत कोसळून १६ जणांचा मृत्यू

मनाली (हिं.स.) : हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथे बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १६ जण मृत्यूमुखी पडले आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेने येणारी खासगी बस जंगला गावाजवळ रस्त्यावरून घसरली, त्यामुळे हा भीषण अपघात घडला. मृतकांमध्ये काही शाळकरी मुलांचाही समावेश आहे.


यासंदर्भातील माहितीनुसार कुल्लू जिल्ह्यातील शैनशारमध्ये एका खाजगी बसचा अपघात झाला. बस जंगला गावापासून जवळपास २०० मीटर अंतरावर रस्त्यावरुन दरीत कोसळली. दुर्घटनेत १६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या प्रवाशांमध्ये शाळकरी मुलांचाही समावेश आहे. जखमींमध्ये बसच्या चालकाशिवाय प्रवाशांचा समावेश आहे. अपघातग्रस्त बस रस्त्यावरुन तब्बल २०० मीटरपर्यंत खोल दरीत कोसळली. ही दुर्घटना सोमवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी घडली. बस शैनशारहून औटच्या दिशेने जात होती.


कुल्लूचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी सांगितले की, बस अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्दैवी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात ट्वीटरवर संदेश जारी करत पंतप्रधान म्हणाले की, या दु:खद प्रसंगी माझ्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. मला आशा आहे की, जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होईल.


स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वोतोपरी मदत करत आहे. यासोबत पंतप्रधानांनी या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी २ लाख रुपयांची सानुग्रह मदत मंजूर केली आहे. तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत