मनाली (हिं.स.) : हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथे बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १६ जण मृत्यूमुखी पडले आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेने येणारी खासगी बस जंगला गावाजवळ रस्त्यावरून घसरली, त्यामुळे हा भीषण अपघात घडला. मृतकांमध्ये काही शाळकरी मुलांचाही समावेश आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार कुल्लू जिल्ह्यातील शैनशारमध्ये एका खाजगी बसचा अपघात झाला. बस जंगला गावापासून जवळपास २०० मीटर अंतरावर रस्त्यावरुन दरीत कोसळली. दुर्घटनेत १६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या प्रवाशांमध्ये शाळकरी मुलांचाही समावेश आहे. जखमींमध्ये बसच्या चालकाशिवाय प्रवाशांचा समावेश आहे. अपघातग्रस्त बस रस्त्यावरुन तब्बल २०० मीटरपर्यंत खोल दरीत कोसळली. ही दुर्घटना सोमवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी घडली. बस शैनशारहून औटच्या दिशेने जात होती.
कुल्लूचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी सांगितले की, बस अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्दैवी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात ट्वीटरवर संदेश जारी करत पंतप्रधान म्हणाले की, या दु:खद प्रसंगी माझ्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. मला आशा आहे की, जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होईल.
स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वोतोपरी मदत करत आहे. यासोबत पंतप्रधानांनी या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी २ लाख रुपयांची सानुग्रह मदत मंजूर केली आहे. तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…