शिंदे गटातील आमदार राहत असलेल्या पणजीतील हाॅटेलातून दोघांना अटक

Share

पणजी (हिं.स.) : बंडखोर शिंदे गटातील आमदार विशेष सुरक्षा व्यवस्थेत शनिवारी रात्री मुंबईत पोहोचले. मात्र याआधी हा गट थांबलेल्या गोव्यातील ताज हॉटेलमधून दोघांना अटक करण्यात आली. यातील सोनिया दोहान ही हरयाणाची, तर श्रेय कोटीयाल हा उत्तराखंड राज्यातील असून ते दोघे राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंडखोर आमदार राहत असलेल्या हॉटेलमध्ये बोगस ओळखपत्राद्वारे प्रवेश करून राहणाऱ्या दोघांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. बनावट नावे आणि बोगस ओळखपत्रांच्या आधारे ते दोघे रूम नंबर ६२५ मध्ये वास्तव्यास होते. बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी दुहा येथे आल्या असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी कलम ४१९, ४२० अंतर्गत बोगस ओळखपत्र देणे आणि भलत्याच व्यक्तीच्या नावे हॉटेलमध्ये राहणे या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही बंड केले होते. त्यानंतर आमदारांना पळवून आणण्यात सोनिया दुहा यांची प्रमुख भूमिका असल्याचेही आता समोर येत आहे.

पणजीचे पोलीस निरीक्षक सूरज गवस यांनी याबाबत सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेले दोघे जण बनावट नावाने हॉटेलमध्ये दिवसभर थांबले होते आणि ओळख बदलून राहिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे ते हेरगिरी करत असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या आधारे त्यांना अटक केली आहे. मात्र अटक करण्यात आलेले दोघे जण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का याबाबत पोलिसांनी काहीही माहिती दिलेली नाही.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago