संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै पासून

नवी दिल्ली (हिं.स.) : संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होणार आहे. लोकसभा सचिवालयाने गुरुवारी ३० जून रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक १८ जुलैपासून होण्याची शक्यता आहे आणि अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी संपणार आहे.


गेल्या वर्षीचे २०२१ मधील पावसाळी अधिवेशन हे गेल्या दोन दशकांतील तिसरे सर्वात कमी फलदायी लोकसभेचे अधिवेशन होते, ज्यामध्ये केवळ २१ टक्के कामकाज झाले. राज्यसभेत २८ टक्के कामकाज झाले होते. यंदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणासाठी विधेयक मांडण्याच्या तयारीत आहे. या विधेयकात अशी तरतूद असेल की ज्या बँकांमध्ये खासगी भागीदारी आहे त्या बँकांमधून सरकारने आपली हिस्सेदारी पूर्णपणे काढून घ्यावी. यासाठी सरकार बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक आणणार आहे.


बँकिंग कंपनी कायदा, १९७० नुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सरकारची ५१ टक्के हिस्सेदारी असणे अनिवार्य आहे. सरकारने यापूर्वी प्रस्तावित केले होते की त्यांची हिस्सेदारी ५१ ऐवजी २६ टक्के राहिल आणि ती सुद्धा हळूहळू खाली येईल. या विधेयकासोबत एक यंत्रणा तयार केली जाईल. हे विधेयक आपण पावसाळी अधिवेशनातच आणू शकतो आणि त्यानंतर इतर काही मुद्द्यांवर काम केले जाईल.

Comments
Add Comment

मोठी अपडेट: गौतम अदानी व सागर अदानी यांच्या विरोधात अमेरिकेची मोर्चेबांधणी! कथित लाच प्रकरणात अमेरिकेची भारताविरुद्ध आक्रमक भूमिका

मुंबई: आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, युएस नियामक (Regulators) यांनी उद्योगपती गौतम अदानी

पश्चिम रेल्वेचे दोन गाड्यांच्या टर्मिनल आणि डब्यांच्या रचनेत तात्पुरते बदल

मुंबई कर्णावती एक्सप्रेस वांद्रे टर्मिनस येथून आणि वंदे भारत एक्सप्रेस २० डब्यांच्या रेकसह धावणार मुंबई  : २२

परळच्या केईएम रुग्णालयाचे नाव बदला

मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश मुंबई : सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक

इंडिगो एअरलाईन्सचा तिमाही निकाल जाहीर नफ्यात ७८% घसरण 'या' कारणांमुळे शेअर ३% कोसळला

मोहित सोमण: गेल्या महिनाभरात डीजीसीए (DGCA) या नियामक मंडळाच्या कचाट्यात सापडलेल्या इंडिगो (इंटरग्लोब एव्हिऐशन

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिवादन

मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय प्रवाहाला ठोस आकार देणारे नेते म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे

Pune Traffic : रस्तेबंदीच्या फलकांमुळे पुणेकर चक्रावले! सायकल स्पर्धेसाठी ९ ते ६ रस्ते बंद की टप्प्याटप्प्याने? पाहा नेमके बदल काय?

पुणे : पुणे शहरात आज, शुक्रवारी (२३ जानेवारी) 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा