संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै पासून

  87

नवी दिल्ली (हिं.स.) : संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होणार आहे. लोकसभा सचिवालयाने गुरुवारी ३० जून रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक १८ जुलैपासून होण्याची शक्यता आहे आणि अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी संपणार आहे.


गेल्या वर्षीचे २०२१ मधील पावसाळी अधिवेशन हे गेल्या दोन दशकांतील तिसरे सर्वात कमी फलदायी लोकसभेचे अधिवेशन होते, ज्यामध्ये केवळ २१ टक्के कामकाज झाले. राज्यसभेत २८ टक्के कामकाज झाले होते. यंदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणासाठी विधेयक मांडण्याच्या तयारीत आहे. या विधेयकात अशी तरतूद असेल की ज्या बँकांमध्ये खासगी भागीदारी आहे त्या बँकांमधून सरकारने आपली हिस्सेदारी पूर्णपणे काढून घ्यावी. यासाठी सरकार बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक आणणार आहे.


बँकिंग कंपनी कायदा, १९७० नुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सरकारची ५१ टक्के हिस्सेदारी असणे अनिवार्य आहे. सरकारने यापूर्वी प्रस्तावित केले होते की त्यांची हिस्सेदारी ५१ ऐवजी २६ टक्के राहिल आणि ती सुद्धा हळूहळू खाली येईल. या विधेयकासोबत एक यंत्रणा तयार केली जाईल. हे विधेयक आपण पावसाळी अधिवेशनातच आणू शकतो आणि त्यानंतर इतर काही मुद्द्यांवर काम केले जाईल.

Comments
Add Comment

POP Ganesh Idols : महत्वाची बातमी! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मूर्तिकार अन् मंडळांना मोठा दिलासा मुंबई : गणेशभक्तांसाठी आणि मूर्तिकारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.

Nasik Kumbh Mela: सिंहस्थ २०२६ च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विशेष प्राधिकरण स्थापनेची तयारी

प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी विभागीय आयुक्तासह 21 सदस्यांची नियुक्ती, राज्यपालांच्या मंजुरीनंतर कामांना

PM Modi : मातृभाषांचा सन्मान, मोदींचा संकल्प! मोदींची ११ वर्षे, ११ भाषांचा सुवर्णकाळ

नेहरूंनी बाजूला सारलं, मोदींनी भाषांना तारलं मातृभाषांला नवजीवन: मोदींचा ऐतिहासिक निर्णय भाषा ही फक्त

Mumbai Local Train Accident: "बाहेरच्या लोंढ्यांमुळं मुंबईची रेल्वे सेवा कोलमडली": राज ठाकरे

मुंबई: दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान धावत्या लोकलच्या गाडीतून ८ ते १२ प्रवासी रेल्वे रुळावर पडल्याची

Pandharpur : वारकर्‍यांना सुलभ दर्शनासाठी तुळशीपूजा बंद! वारकरी संप्रदायाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन रांगेत ६ ते ७ तास ताटकळत उभे राहावे लागले

Crisil Thali Report: मे महिन्यात घरगुती थाळी ६ टक्क्याने स्वस्त - क्रिसील अहवाल

प्रतिनिधी: क्रिसिल (CRISIL) रिसर्चने आपला नवा अहवाल प्रदर्शित केला आहे. त्यांनी आपल्या अहवालात म्हटल्याप्रमाणे