आता तरी आम्हाला सोडा हो!

  63

मुंबई : राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदानाला न्यायालयाने परवानगी नाकारली होती. आता तरी आम्हाला बहुमत चाचणीसाठी सोडा हो! असे म्हणत तुरुंगात असलेले माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी बहुमत चाचणीत मतदान करायला सोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याने राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. मात्र, शिवसेनेने विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे.


दरम्यान, तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बहुमत चाचणीत मतदान करण्यासाठी सोडण्यात यावे, अशी मागणी मलिक आणि देशमुख यांनी केली आहे. आज सायंकाळी ५.३० वाजता त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याचवेळेस, शिवसेनेनेही बहुमत चाचणीच्या निर्णयाला आव्हान दिल्याची याचिका सुनावणीत असेल.


यापूर्वीही आमदार मलिक आणि देशमुख यांनी राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने ही परवानगी नाकारली होती.

Comments
Add Comment

गणेशोत्सवात पुण्यात तीन दिवस मद्यविक्री बंद! कोणत्या तारखांना बंदी?

जुन्नर: गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा पुणे शहर

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंवर मराठा आंदोलकांकडून मारहाणीचा प्रयत्न! कुठे घडली घटना? वाचा नेमके काय घडले

पुरंदर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या विरोधात पुरंदर येथे मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात

पुरामुळे पिकं झाले उद्ध्वस्त, वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, हृदयद्रावक Video Viral

लातूर: महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेली

"सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र..." मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विखे पाटील यांनी केलं स्पष्ट

मुंबई: जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी

'गोकुळ'ने दूध खरेदी किंमत आणि छोट्या डेअरींसाठीच्या अनुदानात केली वाढ

कोल्हापूर: गोकुळ डेअरी किंवा गोकुळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने

हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

इगतपुरी: जिल्ह्यातील हरिहर येथे ट्रेकिंगसाठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांचा परत उतरताना पडून मृत्यू