राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र... वाचा जसेच्या तसे...

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकारचे बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात सध्याच्या घडामोडींचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी राज्यातील राजकीय स्थितीबाबतही भाष्य केले आहे.


राज्यपालांनी या पत्रात बहुमत चाचणीसाठीच्या निर्देशांसाठी अनेक छोट्या बाबींवर लक्ष दिले आहे. सभागृहात बहुमत चाचणी दरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठीदेखील खबरदारी घेण्यास राज्यपालांनी सांगितले आहे.


२८ जून २०२२ रोजी ७ अपक्ष आमदारांनी राजभवनाला ई-मेल पाठवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बहुमत नसल्यानं लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याची मागणी ई-मेलद्वारे केली आहे


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी २८ जून २०२२ रोजी माझी भेट घेतली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती समजावून सांगत मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावल्याचा दावा त्यांच्याकडूनही करण्यात आला.


घोडेबाजार टाळण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याची विनंती विरोधी पक्षनेत्यांनीही केली


शिवनसेनेतील ३९ आमदारांच्या घरावर आणि कार्यालयावर होणारे हल्ले पाहता त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. माध्यमांतील बातम्या पाहता, मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करणं अपरिहार्य असून त्यासाठी बहुमत चाचणी घेण्यात यावी


राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून सरकारकडे बहुमत आणि सभागृहाचा विश्वास असल्याची खातरजमा करणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी ३० जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवलं आहे


विधीमंडळाच्या सचिवांनी बहुमत चाचणीसाठी ३० जून २०२२ रोजी विशेष अधिवेशन बोलवण्याची सूचना मी या पत्राद्वारे देत आहे.


मी खालील आदेश देत आहे...


३० जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं आणि बहुमत चाचणीची प्रक्रिया संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात यावी.


काही नेत्यांची चिथावणीखोर वक्तव्य पाहता विधानभवनात आणि विधानभवनाबाहेर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात यावी, जेणेकरून बहुमत चाचणीची प्रक्रिया सुरळीत पार पडेल.


सभागृहाच्या कामकाजाचं लाईव्ह प्रेक्षपण करण्यात यावं.


आमदारांना त्यांच्या जागेवर उभं राहून शिरगणतीद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पाडावी.


कोणत्याही कारणास्तव बहुमत चाचणीची प्रक्रिया पुढे ढकलता येणार नाही.


बहुमत चाचणीच्या प्रक्रियेचं व्हीडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावं आणि त्याचा अहवाल माझ्याकडे सोपवण्यात यावा.


- भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना