पदवी प्रवेशासाठी इन हाऊस कोट्यात २५ टक्क्यांनी घट

Share

मुंबई (प्रतिनिधी) : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांची विद्यापीठात ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. या कालावधीत इन हाऊस प्रवेश देण्यात यावेत, असे विद्यापीठाने जाहीर केले होते. ही प्रक्रिया संपत आली असली, तरी दर वर्षीच्या तुलनेत यंदा इन हाऊस कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २५ टक्क्यांनी घट झाली आहे.

याबाबत काही प्राचार्यांनी सांगितले की, बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठीचे कॉलेजांच्या अंतर्गत (इन हाऊस) कोट्यातील प्रवेश यंदा संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. अलीकडे बारावीनंतर विद्यार्थ्यांची व्यावसायिक अभ्यासक्रमांना अधिक पसंती असल्याने कॉलेजांच्या अंतर्गत कोट्यातील प्रवेशप्रक्रिया यंदा संथगतीने होत आहे. प्रवेश प्रक्रियेची चौथी यादी जाहीर झाल्यानंतरही विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी धडपड करत असत. पण आता विद्यार्थ्यांची व्यावसायिक अभ्यासक्रमाला पसंती आहे.

इन हाऊस कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आता “सेल्फ फायनान्स अभ्यासक्रम”ची मागणी जास्त आहे. या प्रकारच्या कोर्सेसमध्ये कमी कालावधीत शिक्षण लवकर पूर्ण होते आणि रोजगाराची संधी असते. त्या शिवाय हल्ली मुक्त शिक्षण विद्यापीठाचा जास्त ट्रेंड सुरू आहे. यात कॉलेजमध्ये न जाता बाहेरून आपले शिक्षण पूर्ण करता येते आणि विद्यार्थ्यांना आपली नोकरीही सुरू ठेवता येते. अद्याप यंदा सीबीएसई आणि आयएससी बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे यावर्षी ही प्रवेश प्रक्रिया प्रथम राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची होणार आहे. पण सीबीएसई आणि आयएससी बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यासाठी इन हाउस कोटामध्ये प्रवेश निश्चित केला जात असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

Recent Posts

टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले जखमी

मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष काही क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र भारी ठरला. खरंतर, भारतीय…

25 mins ago

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

8 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

9 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

10 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

10 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

11 hours ago