पदवी प्रवेशासाठी इन हाऊस कोट्यात २५ टक्क्यांनी घट

मुंबई (प्रतिनिधी) : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांची विद्यापीठात ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. या कालावधीत इन हाऊस प्रवेश देण्यात यावेत, असे विद्यापीठाने जाहीर केले होते. ही प्रक्रिया संपत आली असली, तरी दर वर्षीच्या तुलनेत यंदा इन हाऊस कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २५ टक्क्यांनी घट झाली आहे.


याबाबत काही प्राचार्यांनी सांगितले की, बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठीचे कॉलेजांच्या अंतर्गत (इन हाऊस) कोट्यातील प्रवेश यंदा संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. अलीकडे बारावीनंतर विद्यार्थ्यांची व्यावसायिक अभ्यासक्रमांना अधिक पसंती असल्याने कॉलेजांच्या अंतर्गत कोट्यातील प्रवेशप्रक्रिया यंदा संथगतीने होत आहे. प्रवेश प्रक्रियेची चौथी यादी जाहीर झाल्यानंतरही विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी धडपड करत असत. पण आता विद्यार्थ्यांची व्यावसायिक अभ्यासक्रमाला पसंती आहे.


इन हाऊस कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आता “सेल्फ फायनान्स अभ्यासक्रम”ची मागणी जास्त आहे. या प्रकारच्या कोर्सेसमध्ये कमी कालावधीत शिक्षण लवकर पूर्ण होते आणि रोजगाराची संधी असते. त्या शिवाय हल्ली मुक्त शिक्षण विद्यापीठाचा जास्त ट्रेंड सुरू आहे. यात कॉलेजमध्ये न जाता बाहेरून आपले शिक्षण पूर्ण करता येते आणि विद्यार्थ्यांना आपली नोकरीही सुरू ठेवता येते. अद्याप यंदा सीबीएसई आणि आयएससी बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे यावर्षी ही प्रवेश प्रक्रिया प्रथम राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची होणार आहे. पण सीबीएसई आणि आयएससी बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यासाठी इन हाउस कोटामध्ये प्रवेश निश्चित केला जात असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना