देशातील पोटनिवडणुकीत भाजपचा बोलबाला

  62

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशामध्ये मोदी लाटच अजूनही कायम असल्याचे निकालावरून पुन्हा एकवार स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विजय मिळवला आहे, आझमगडमध्येही विजय मिळवला आहे. लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपचाच बोलबाला पुन्हा पहावयास मिळाला आहे. रामपूरमध्ये भाजपच्या घनश्याम लोधी यांनी सपा उमेदवार असीम राजा यांच्यावर ४२ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.


विधानसभेच्या सातही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या जागांसाठी २३ जून रोजी मतदान झाले होते. यामध्ये आपने दिल्लीतील राजेंद्र नगर जागा जिंकली आहे. त्याचवेळी त्रिपुरामध्ये भाजपने ४ पैकी ३ जागा जिंकल्या आहेत व काँग्रेसने १ जागा जिंकली आहे. वायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशातील आत्मकूर जागा जिंकली आहे. झारखंडमधील मंदार मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला आहे.


पंजाबमधील संगरूर येथे शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे सिमरनजीत सिंग मान ५ हजार ८२२ मतांनी विजयी झाले. आम आदमी पक्षाचे गुरमेल सिंग दुसऱ्या, तर काँग्रेसचे दलवीर गोल्डी तिसऱ्या स्थानावर राहिले. येथे अकाली दल आणि भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. आझम खान यांच्या राजीनाम्यामुळे आझमगड आणि अखिलेश यांच्या राजीनाम्याने रामपूरची जागा रिक्त झाली होती. दोन्ही जागा यापूर्वी सपाच्या ताब्यात होत्या.


भगवंत मान मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या संगरूर लोकसभा जागेवर आपने गुरमेल सिंग, काँग्रेस दलवीर सिंग गोल्डी आणि भाजपने केवल धिल्लन यांना उमेदवारी दिली होती. सिमरनजीत सिंग मान यांना अकाली दलाने (अमृतसर) उमेदवारी दिली होती.


दिल्लीतील राजेंद्र नगर मतदारसंघात आपचे दुर्गेश पाठक ११ हजार ४६८ मतांनी विजयी झाले आहेत. त्रिपुरामध्ये, आगरतळा, बोर्डोवाली टाऊन आणि सूरमा येथील भाजप आमदारांनी राजीनामा दिला होता.


जुबराजागरमधील सीपीआय (एम) आमदाराचे निधन झाले. बोरदोवली टाऊनमधून सीएम माणिक साहा यांनी काँग्रेसच्या आशीष कुमार साहा यांच्याविरोधात विजय मिळवला. माणिक ६ हजार १०४ मतांनी विजयी झाले आहेत.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये