मंत्रालयात अधिकाऱ्यांची धावपळ

मुंबई (वार्ताहर) : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राज्यात मोठ्या घडामोडी होत आहेत. महाविकास आघाडी सरकार पडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या खात्यांच्या फाइली क्लिअर करण्यासाठी सध्या मंत्रालयात मंत्री आणि अधिकाऱ्यांची धावपळ वाढली आहे.


'सत्तांतर होणार' यामुळे फाइलींवर सह्या घेणे, अर्ज निकाली काढणे आदी कामे गेल्या दोन दिवसांत वाढली आहेत. कामांच्या मंजुरीसाठी टेबलांवर ढिगात फाइल्स पडून असल्याचे चित्र सध्या मंत्रालयात दिसत आहे. महत्त्वाच्या विषयांवरील मंत्रालयातील फाइल्स, महत्त्वाचे अर्ज याचे काम करून घेण्यासाठी अनेक जणांच्या मुंबईच्या वाऱ्या वाढल्या आहेत.


अनेक महिन्यांपासून मंत्रालयात धूळ खात पडलेल्या फाइल कपाटातून शोधण्यासाठी अधिकारी आणि संबधीतांची धावपळ उडत आहे. यामुळे फाइलच्या संबधीत विभागातील कर्मचाऱ्यांचे नेहमीपेक्षा काम वाढले आहे. त्यामुळे त्यांच्यावरचा ताण वाढला आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे मंत्रालयातील अधिकांऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण