कोल्हापूर : कोणाला काय उत्तर द्यायचे, याचे अधिकार आमच्या नेत्यांना आहेत. नारायण राणे हे शरद पवारांना काय म्हणाले, ते पाहावे लागेल. मात्र आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांच्या ‘त्या’ वक्तव्याचे समर्थन केले. तसेच आमच्या पार्टीतील नेत्यांना इतरांनी टीका केल्यास त्याला उत्तर देण्याचे अधिकार असल्याचे पाटील यांनी कोल्हापूर येथे बोलताना स्पष्ट केले.
महाराष्ट्रात भाजपची अधिकृत भूमिका अध्यक्ष म्हणून मी मांडत असतो, असे पाटील म्हणाले. शरद पवार आणि नारायण राणे काय म्हणाले मला माहित नाही. पण शरद पवार आणि संजय राऊत यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरा जास्त आहे, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान, राज्यात सध्या सुरू असलेल्या बंडखोरीच्या परिस्थितीबाबत अनभिज्ञ असून या घटनांचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ज्या काही घडामोडी आहेत, त्या टिव्हीवरच पाहायला मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…