Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीभास्कर जाधवांनी संजय राऊतांना झापले!

भास्कर जाधवांनी संजय राऊतांना झापले!

'आव्हान द्यायची ही वेळ नाही'

रत्नागिरी : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून सांगतो, आम्ही हार मानणार नाही, आम्ही जिंकणार, आमची संपूर्ण तयारी झाली आहे, आता तुम्ही मुंबईत याच, असा इशारा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना दिला. संजय राऊतांच्या या विधानावर आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता, ही आव्हान द्यायची वेळ नाही. त्यांच्याशी संवाद साधा. त्यामुळे मतभेद कमी होतील, नेहमीच आव्हान देऊन काही होत नाही, अशा शब्दात भास्कर जाधवांनी संजय राऊतांना झापले.

राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत हे कमालीच्या आक्रमक पावित्र्यात दिसले. आम्ही जिंकणार, विधानसभेत विश्वास ठरावही जिंकू. या मंडळींनी खूप चुकीचं पाऊल उचललं आहे. आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आता वेळ निघून गेली आहे, असे संजय राऊत म्हणाले.

त्यावर आपले आमदार का नाराज आहेत, ते का सोडून गेले? आपले मंत्री का निघून गेले हे समजून घ्यायला पाहिजे, असे भास्कर जाधव म्हणाले. तसेच मी तेव्हाही सांगितले होते की, आपल्या कोट्यातील मंत्रिपद इतरांना देऊ नका, शिवसेनेने मुख्यमंत्री पद घेतले. मात्र आपल्या कोट्यातील ३ मंत्रीपद अपक्ष आमदारांना का दिली?, असा सवालही भास्कर जाधव यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -