
आसाम : बंड केलेले शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत एक पत्र शेअर केले आहे.
या ट्वीटमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेले ते पत्र आहे. या पत्रातून केलेला उल्लेख म्हणजे संजय राऊतांवर साधलेला थेट निशाणा असल्याचे दिसत आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1539863093571792896अडीच वर्षे तुमच्या बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच So called (चाणक्य, कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवत होते, असा उल्लेख या पत्रात आहे.
मतदारसंघातील कामे, इतर प्रश्न, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायंचं आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय, असा निरोप बडव्यांकडून यायचा. पण तासनसात बंगल्यावर गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेक वेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का? असा सवालही या पत्रातून उपस्थित केला आहे.