Saturday, May 24, 2025

महामुंबई

मुंबईवर पाणीकपातीचे संकट

मुंबईवर पाणीकपातीचे संकट

सीमा दाते


मुंबई : जून महिन्याचा तीसरा आठवडा सुरू झाला असला तरी हवा तसा पाऊस पडलेला नाही. यामुळेच मुंबईवर पाणी कपातीचे संकट आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये एकूण साठ्याच्या केवळ १०.४५ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे.


मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्यावर्षी वर्षभर पुरेल असा पाणी साठा होता. मात्र यंदा जून महिन्याचा तीसरा आठवडा सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात धरणक्षेत्रात पाऊस झाला नसल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट आहे. सध्या १०.४५ इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे, तर सर्व तलावांमध्ये १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर पाण्यापैकी १५ हजार १२३ कोटी लिटर म्हणजेच एकूण साठ्याच्या केवळ साडेदहा टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. दरम्यान दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसे झाल्यास मुंबईकरांवरचे पाणी कपातीचे संकट टळू शकते.




मुंबईला दररोज अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधून दिवसाला ३८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो.


मुंबईकरांसाठी वर्षभर १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. सध्या या धरणांमध्ये १५ हजार १२३ कोटी लिटर एवढा पाण्याचा साठा शिल्लक आहे.

Comments
Add Comment