Sunday, June 8, 2025

आमदार काय मच्छिबाजार वाटला का, हितेंद्र ठाकूरांचा राऊतांवर निशाणा

आमदार काय मच्छिबाजार वाटला का, हितेंद्र ठाकूरांचा राऊतांवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक सुरू आहे. सायंकाळी ४ वाजता सर्व आमदारांनी आपले मत टाकले आहे. यानंतर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.


राज्यसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी आमदार फुटल्याबाबत तीव्र आरोप केले होते. याबाबत विचारले असता हितेंद्र ठाकूर म्हणाले की, या निवडणुकीचा निकाल लागला की कळेल, कोण फुटले आणि कोण नाही, असे सांगत जो निवडणुकीत हरतो, तो असे खापर दुसऱ्यांवर फोडत असतो. आमदार काय मच्छिबाजार वाटला का, अशी विचारणा केली.


तर, तुमच्यात हिंमत असेल, तर सगळ्यांसमोर एकदा काय ते जाहीर करून टाका. संजय राऊत यांनी त्यांना अपेक्षित मते मिळाली नाही, त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. माझ्यावर आरोप केले नव्हते, असे सांगत हितेंद्र ठाकूर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Comments
Add Comment