श्रीराम मंदिर निर्मितीसाठी दान केलेले २२ कोटींचे चेक बाऊन्स

अयोध्या : श्रीराम मंदिर निर्मितीसाठी दान केलेले २२ कोटींचे चेक बाऊन्स झाल्याची खळबळजनक माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे जमा झालेला निधी मोजताना उघडकीस आली आहे.


रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे जमा झालेला निधी अद्यापही पूर्णपणे मोजलेला नाही. काही जिल्ह्यानिहाय ऑडिटींगचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. सध्या देशातून आलेल्या निधीची मोजणी सुरू आहे. यामध्ये रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला धक्कादायक अनुभव आला आहे. ट्रस्टच्या वतीने चालवण्यात आलेल्या समर्पण अभियानात आतापर्यंत सुमारे ५४५७.९४ कोटींचा निधी जमवला आहे. मात्र, दान म्हणून आलेल्या रक्कमेतील जवळपास २२ कोटींच्या रक्कमेचे चेक बाऊन्स झाले आहेत. त्याबाबतचा एक वेगळा अहवाल तयार केला जात आहे. त्यातून हे चेक का वटले नाहीत याचा खुलासा होणार आहे.


काही तांत्रिक कारणांमुळे बाऊन्स झालेल्या चेकबाबत बँकेसोबत चर्चा करण्यात येणार आहे. सध्या मिळालेल्या वृत्तानुसार, कूपन, डिजीटल माध्यमातून आणि पावतींच्या माध्यमातून २२५३.९७ कोटींची निधी जमवण्यात आला आहे. एसबीआय-पीएनबी आणि बँक ऑफ बडोदामधील बचत खात्यात जवळपास ४५० कोटी रुपयांचा निधी जमला आहे. ट्रस्टने निधीसाठी दहा रुपये, शंभर रुपये आणि एक हजार रुपयांचे कूपन छापण्यात आले होते. या रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेसाठी पावत्यांचा वापर करण्यात आला.


ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी तयार केलेल्या अहवालानुसार, १० रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून ३०.९९ कोटी रुपये, १०० रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून ३७२.४८ कोटी रुपये आणि एक हजार रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून २२५.४६ कोटी रुपये आणि पावती पुस्तकांच्या माध्यमातून १६२५.०४ कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. अशा प्रकारे २२५३.९७ कोटींचा निधी जमवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या