अयोध्या : श्रीराम मंदिर निर्मितीसाठी दान केलेले २२ कोटींचे चेक बाऊन्स झाल्याची खळबळजनक माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे जमा झालेला निधी मोजताना उघडकीस आली आहे.
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे जमा झालेला निधी अद्यापही पूर्णपणे मोजलेला नाही. काही जिल्ह्यानिहाय ऑडिटींगचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. सध्या देशातून आलेल्या निधीची मोजणी सुरू आहे. यामध्ये रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला धक्कादायक अनुभव आला आहे. ट्रस्टच्या वतीने चालवण्यात आलेल्या समर्पण अभियानात आतापर्यंत सुमारे ५४५७.९४ कोटींचा निधी जमवला आहे. मात्र, दान म्हणून आलेल्या रक्कमेतील जवळपास २२ कोटींच्या रक्कमेचे चेक बाऊन्स झाले आहेत. त्याबाबतचा एक वेगळा अहवाल तयार केला जात आहे. त्यातून हे चेक का वटले नाहीत याचा खुलासा होणार आहे.
काही तांत्रिक कारणांमुळे बाऊन्स झालेल्या चेकबाबत बँकेसोबत चर्चा करण्यात येणार आहे. सध्या मिळालेल्या वृत्तानुसार, कूपन, डिजीटल माध्यमातून आणि पावतींच्या माध्यमातून २२५३.९७ कोटींची निधी जमवण्यात आला आहे. एसबीआय-पीएनबी आणि बँक ऑफ बडोदामधील बचत खात्यात जवळपास ४५० कोटी रुपयांचा निधी जमला आहे. ट्रस्टने निधीसाठी दहा रुपये, शंभर रुपये आणि एक हजार रुपयांचे कूपन छापण्यात आले होते. या रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेसाठी पावत्यांचा वापर करण्यात आला.
ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी तयार केलेल्या अहवालानुसार, १० रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून ३०.९९ कोटी रुपये, १०० रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून ३७२.४८ कोटी रुपये आणि एक हजार रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून २२५.४६ कोटी रुपये आणि पावती पुस्तकांच्या माध्यमातून १६२५.०४ कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. अशा प्रकारे २२५३.९७ कोटींचा निधी जमवण्यात आला आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…