कर्करोगावर मात करून दिव्या १० वीच्या परीक्षेत उत्तीर्ण

Share

ठाणे (हिं.स.) : कर्क रोगावर मात करत दिव्याने १०वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. कोरोना महामारीत विद्यार्थ्यांना शाळेपासून दोनवर्षं मुखावे लागले. यात दिव्याचादेखील समावेश होता. या दरम्यानच्या काळात दिव्याला दम लागणे सुक्या खोकल्याची लागण झाली. त्यामुळे पालकांनी दिव्याची कोरोनाची त्वरित तपासणी केली. परंतु ती या टेस्टमध्ये निगेटिव्ह आली.

दिव्याच्या तब्येतीत सुधारणा होत नासण्याने डॉक्टरांनी सिटी स्कॅनचा सल्ला दिला. सिटी स्कॅन केले असता त्यात दिव्याला कर्करोग असण्याचा अंदाज व्यक्त केला. या दरम्यान दिव्या आपल्या गावी वाकलवाडी पुणे येथे होती. तिला ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि तिला कर्करोग असल्याने निदर्शनास आले. पुढील उपचारासाठी दिव्याला टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दिव्याला केमो थेअरिपीसाठी ठाणे ते परेल हा प्रवास ९ महिने करावा लागला. त्यात तिला १४ वेळा रक्ताची गरज आणि १५ वेळा प्लेटलेट्स कमी पडल्याने पांढऱ्या पेशींची गरज भासली. या कठीण काळात पालकांनी दिव्याला १०वी ची परीक्षा न देण्याचा सल्ला दिला परंतु दिव्याने परीक्षा देण्याचा हट्ट धरला आणि पालकांनी तिला परवानगी दिली.

या परीक्षेच्या काळात दिव्याला शेवटचे तीन पेपर असताना नागीण या रोगाची लागण झाली. दिव्याचे कर्करोगावर अजूनही उपचार चालू आहेत. अशा कठीण परिस्थितीत देखील दिव्याच्या जिद्दीमुळे तिला घवघवीत यश मिळाले.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

2 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

3 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

4 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

4 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

5 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

5 hours ago