पालिकेच्या शाळा सुरू; पण विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकेच नाहीत

मुंबई (प्रतिनिधी) : दरवर्षी मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पालिकेकडून २७ शालेय वस्तू देण्यात येतात. मात्र यंदा शाळा सुरू झाल्या असल्या तरी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप शालेय वस्तू मिळाल्या नसल्याची टिका आमदार आशीष शेलार यांनी केली आहे. दरम्यान पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या "दप्तर" दिरंगाईचे उत्तर द्यावे अशी मागणी शेलार यांनी केली आहे.


दरवर्षी मुंबई महापालिकेकडून पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, रेनकोटसह विविध २७ वस्तू देण्यात येतात. मात्र यंदा निविदाच मंजूर न झाल्याने साहित्य पोहचायला आता ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता असून दप्तर सप्टेंबरमध्येच मिळेल असा कयास असल्याचे शेलार म्हणाले. तर दुसरीकडे महापालिका शाळा इंग्रजी माध्यमाच्या करून एकीकडे पब्लिक स्कूल नावाने आदित्य ठाकरेंची प्रसिद्धी सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र गरीब विद्यार्थ्यांना रेनकोट, पाटी, पेन्सिल, दप्तराशिवाय वर्गात बसावे लागत आहे. याचे दुर्दैव असल्याची टीकाही शेलार यांनी केली.


विशेष म्हणजे शाळा सुरू झाल्या त्याच आठवडाभरात हे साहित्य विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित होते. पण अद्याप निविदा मंजूर झालेली नाही आणि यामुळे विलंब होत आहे, की काही वाटाघाटी बाकी आहेत का? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांनी दप्तर, पेन, पेन्सिल शिवाय शाळेत जायचे का? असा देखील सवाल शेलार यांनी उपस्थित केला. दरम्यान येत्या सात दिवसांत जर हे साहित्य उपलब्ध झाले नाही तर विद्यार्थ्यांसाठी भाजप लढेल, असा इशारा आमदार आशिष शेलार यांनी दिला.

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल

मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची खांदेपालट, कुणाची कुठे बदली, कुणाची कुठे वर्णी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा सहायक आयुक्तांची खांदेपालट करून विद्यमान सहायक आयुक्तांची

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरुन नवा वाद, रामदास कदमांनी दिली धक्कादायक माहिती मुंबई : गोरेगावच्या नेस्को