हवाई दलाची भरती प्रक्रिया २४ जून पासून – व्ही.आर. चौधरी

नवी दिल्ली (हिं.स.) : सैन्य दलातील ‘अग्निपथ’ या नव्या भरती योजनेबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. आगामी २४ जून पासून अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय हवाई दलाची भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती एअर चिफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी शुक्रवारी दिली.


यासंदर्भात एअर चिफ मार्शल म्हणाले की, भारत सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत सशस्त्र दलात तरुणांची भरती केली जाऊ शकते. या योजनेत भरतीचे वय १७.५ वर्षे ते २१ वर्षे ठेवण्यात आले आहे. पहिल्या भरतीसाठी तरुणांची कमाल वयोमर्यादा २३ वर्षे करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने तरुण या भरतीसाठी अर्ज करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यासोबतच लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले की, ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत वयोमर्यादा २१ वरून २३ वर्षे करण्याच्या निर्णयामुळे सैन्यात भरती होण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना संधी मिळणार आहे. पण कोरोना साथरोगामुळे गेले २ वर्षे भरती योजना थांबवण्यात आली होती.


लष्करात भरतीसाठी वयात सवलत देण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर लवकरच भरती प्रक्रिया जाहीर केली जाईल, असे जनरल पांडे यांनी सांगितले. लष्करप्रमुखांनी इच्छुक तरुणांना ‘अग्निवीर’ म्हणून सैन्यात भर्ती होण्याच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ‘भरती प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही

१ कोटींचा इनामी माओवादी हिडमा अखेर ठार; सीमेवर भीषण चकमक

छत्तीसगढ : कुख्यात माओवादी कमांडर मडवी हिडमा अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात सापडला. आंध्र प्रदेशातील अल्लुरी

'दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू'

नवी दिल्ली: दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू आणि कठोर शिक्षा करू, असे केंद्रीय

लिव्ह-इन रिलेशनशिप कधीही स्वीकारणार नाही

सोरममधील सर्वखाप पंचायतीने व्यक्त केली नाराजी  उत्तर प्रदेश  : सोरममधील सर्वखाप पंचायतीने लिव्ह-इन रिलेशनशिप

उत्तर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना ५० हजारांचे इंजेक्शन मिळणार मोफत!

सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय उत्तर प्रदेश  : उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी

एसबीआयची लोकप्रिय एमकॅश सेवा १ डिसेंबरपासून बंद

खातेदारांना शोधावे लागतील नवीन पर्याय नवी दिल्ली  : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच