अलिबाग शहरातील पीएनपी नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी

अलिबाग (वार्ताहर) : अलिबाग शहराचे सांस्कृतिक वैभव अशी ओळख निर्माण झालेल्या पीएनपी नाट्यगृहाला बुधवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण नाट्यगृह आगीत भस्मसात झाले आहे. यात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.


अलिबाग शहराच्या वेशीवरच असलेल्या या नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू होते. काम सुरू असताना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वेल्डिंगची ठिणगी पडली आणि आग लागली. धुराचे आणि ज्वाळांचे लोड गगनाला भिडले. अलिबाग नगरपालिका, आरसीएफ, गेल कंपनी तसेच पेण नगरपालिका आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते. त्यासाठी फोमचा मारादेखील करण्यात येत होता. तब्बल दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र आसनव्यवस्थेत असलेल्या फोममुळे आग धुमसतच होती.


या आगीत नाट्यगृहाचे पूर्ण नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर थोडयाच वेळात इमारतीचे छत कोसळून पडले, भिंतीदेखील ढासळल्या. तेथील आसन व्यवस्था, साऊंड सिस्टीम, सर्व लाकडी फर्निचर, सर्व तांत्रिक व्यवस्था जळून खाक झाले. आगीतील नुकसानीचा नेमका आकडा सांगता येत नसला तरी यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.


रसिक हळहळले


राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने पीएनपी सहकारी सांस्कृतिक कलाविकास मंडळाने २०१७ मध्ये हे नाट्यगृह उभारले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अलिबागचे सांस्कृतिक वैभव अशी ओळख या नाट्यगृहाने निर्माण केली होती; परंतु आगीत नाट्यगृह भस्मसात झाल्याने अलिबागकरांनी हळहळ व्यक्त केली.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,