राज्यात ४०२४ कोरोना बाधित

मुंबई : राज्यात आज ४०२४ कोरोना बाधित नवीन रुग्णांचे निदान झाले असून दोन कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज रोजी एकूण १९२६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


आज ३०२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण ७७,५२,३०४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८९ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१४,२८,२२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,१९,४४२ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


राज्यात बी ए.५ व्हेरीयंटचे आणखी ४ रुग्ण


बी जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए. ५ व्हेरियंटचे आणखी ४ रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. या पैकी प्रत्येकी १ रुग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथील आहे. हे सर्व रुग्ण १९ ते ३६ वर्षे वयोगटातील महिला आहेत.


यापैकी ३ रुग्णांची जनुकीय क्रमनिर्धारण तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे आणि एका रुग्णांची तपासणी बी जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे करण्यात आलेली आहे. हे सर्व रुग्ण २६ मे ते ९ जून २०२२ या कालावधीतील असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून