राज्यात ४०२४ कोरोना बाधित

मुंबई : राज्यात आज ४०२४ कोरोना बाधित नवीन रुग्णांचे निदान झाले असून दोन कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज रोजी एकूण १९२६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


आज ३०२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण ७७,५२,३०४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८९ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१४,२८,२२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,१९,४४२ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


राज्यात बी ए.५ व्हेरीयंटचे आणखी ४ रुग्ण


बी जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए. ५ व्हेरियंटचे आणखी ४ रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. या पैकी प्रत्येकी १ रुग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथील आहे. हे सर्व रुग्ण १९ ते ३६ वर्षे वयोगटातील महिला आहेत.


यापैकी ३ रुग्णांची जनुकीय क्रमनिर्धारण तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे आणि एका रुग्णांची तपासणी बी जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे करण्यात आलेली आहे. हे सर्व रुग्ण २६ मे ते ९ जून २०२२ या कालावधीतील असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल