गांधी कुटुंबाने २ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला-देवेंद्र फडणवीस

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी आणि गांधी कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांची चौकशी न्यायालयाच्या निर्णयानुसार झाली आहे. परंतु, संपूर्ण देशभरात आंदोलने करून देशातील जनतेला वेठीस धरण्याचे काम काँग्रेसने केले आहे.


५ हजार स्वातंत्र्यसैनिकांनी तयार केलेल्या एजीएलमध्ये २ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. एजीएल ही कंपनी १९३८ मध्ये तयार झाली होती. स्वातंत्र्यसंग्रामात स्वत:चे वृत्तपत्र असावे म्हणून स्वातंत्र्यसेनानींनी एजीएलची स्थापना केली होती. ही राष्ट्रीय संपत्ती असून खासगी संपत्ती नाही. २०१० मध्ये राहुल गांधी कुटुंबाने यंग इंडिया नावाची कंपनी स्थापन केली आणि एजीएलची संपत्ती यंग इंडियाला ट्रान्सफर केली. काँग्रेसने चौकशीचा बाऊ करण्याऐवजी चौकशीला सामोरे जायला हवे होते असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.


हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर यात भ्रष्टाचार झाल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर ईडीने राहुल गांधी यांची चौकशी केली. काँग्रेसने याचा बाऊ करण्यापेक्षा चौकशीला सामोरे गेले पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांची संपत्ती हडप करणे गुन्हा आहे. परंतु, हा गुन्हा गांधी कुटुंबाने केला आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

उत्तर पश्चिम जिल्ह्यात महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणणार

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.