१८ जूनपासून बारावीच्या गुणपत्रिका शाळा महाविद्यालयातून मिळणार

अमरावती (हिं.स.) मार्च, एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ८ जूनला ऑनलाईन जाहीर झाला. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि तपशीलवर गुण दर्शविणाऱ्या महाविद्यालयांच्या अभिलेखांचे वितरण विभागातील पाचही जिल्ह्यात १८ जूनपासून संबंधित शाळा-महाविद्यालयात होणार आहे.


विभागातील पाचही जिल्ह्यांतील बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाच्या गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणाऱ्या महाविद्यालयांच्या अभिलेखांचे वितरण करण्याबाबतचे नियोजन शिक्षण मंडळाने केले आहे.यानुसार १७ जूनला सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत जिल्ह्यातीलमहाविद्यालयांना गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणाऱ्या महाविद्यालयांच्या अभिलेखांचे वितरण मंडळाने नेमून दिलेल्या केंद्रावर केले जाणार आहे.


त्यानंतर सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत १८ जूनला दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरणकरताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

Pune Fire News : धुराचे लोट आणि फटाक्यांचे स्फोट! पिंपरी-चिंचवडमध्ये गजानन रुग्णालयाखाली अग्नितांडव; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

पुणे : पिंपरी-चिंचवड : औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात आज दुपारी आगीची एक मोठी घटना

नववर्षाची पार्टी बेतली जीवावर! ४०० फुट दरीत कोसळलेल्या तरूणाला रेस्क्यू टीमने दिले जीवनदान

सातारा: नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण पार्टी आणि सहलीला बाहेर गेले आहेत. पार्टी म्हटल्यावर मद्य आणि मांसाहार,

Shirdi New Year 2026 : शिर्डीत साईनामाच्या जयघोषात नववर्षाचे स्वागत! तरुण पिढीची साईचरणी मांदियाळी; साईनगरी भाविकांनी दुमदुमली

शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण साईनगरी सज्ज झाली होती.

कसबा गणपती मूर्तीवरील शेंदूर कवचाची दुरुस्ती

नऊशे किलो शेंदूर हटवून ऐतिहासिक स्वरूपाचे दर्शन पुणे : पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या मूर्तीचे सुमारे

आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय!

शपथपत्राविरोधात दाखल केलेली फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली परळी : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आणखी एका

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,