पृथ्वीराज पाटीलला उदयनराजे देणार बुलेट भेट

  91

सातारा : महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील आणि उपविजेता पैलवान प्रकाश बनकर यांना उदयनराजे मित्र परिवाराकडून जाहीर करण्यात आलेल्या बक्षिस वितरणासाठी आज मुहूर्त लागला. उदयनराजे यांच्या विजेत्यांना बुलेट, मोटरसायकल तसेच रोख रक्कम दिली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला जी बुलेट उदयनराजेंकडून दिली जाणार आहे. त्या बुलेटला खास नंबरही घेण्यात आला आहे. तो नंबर आहे एमएच-०९-जीबी-००७ या नंबरचे उदयनराजे यांच्या ताफ्यातील वाहने आहेत.


छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते हा सत्कार होणार हा इतर सत्कारपेक्षा मोठा सत्कार असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज पाटील याने दिली आहे. घरातील लोकांकडून मला वाहन घेण्यासाठी नकार दिला जात होता. मात्र, उदयनराजे यांच्याकडून मला बुलेट मिळाली हे विशेष आहे. उदयनराजे यांचा ७ हा आकडा आहे, तोच आकडा माझ्या गाडीवर त्यांनी स्वतःहून पत्र देऊन दिला हा एक मोठा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचेही तो म्हणाला.


महाराष्ट्राच्या मातीतील प्रतिष्ठेची स्पर्धा महाराष्ट्र केसरीची लढत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने ५-४ च्या फरकाने मुंबई पश्चिमचे नेतृत्त्व करणाऱ्या विशाल बनकरला मात दिली होती. विशेष म्हणजे जवळपास २१ वर्षांनी कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली. याआधी विनोद चौगुले यांनी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या