पंकजाताईंच्या उमेदवारीसाठी आम्ही खूप प्रयत्न केले

मुंबई : विधान परिषदेसाठी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. आमच्या पार्टीत सर्वजण कोरी पाकीट असतो. जो पत्ता लिहील तिथे जावे लागते. त्यामुळे राजकारणात चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते आणि निर्णय हे शेवटी पक्षाचे असतात. त्यामुळे केंद्राने केलेला निर्णय हा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून सर्वांनी त्याचे पालन करायचे असते. पंकजा ताई यांच्या उमेदवारीसाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. मात्र केंद्राने काही भविष्यातील विचार करुन हा निर्णय घेतला असावा, अशी प्रतिक्रीया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी घोषित केल्यानंतर दिली.


आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या निवडणुकीसाठी पंकजा मुंडेंचा पत्ता कट केला आहे का? या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, पंकजा मुंडेंसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आणि आम्ही खूप प्रयत्न केले. मात्र मुंडे यांच्याऐवजी भाजपाकडून उमा खापरे यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे.


पुढे ते म्हणाले, ईच्छा व्यक्त करणे आणि नाराजी व्यक्त करणे यात काही गैर नाही. मात्र भाजपातील नाराजी लगेच भरली जाते. पंकजा मुंडे यांच्याकडे सध्या उत्तर प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. आणखी कोणतीतरी जबाबदारी संघटनेला पंकजा मुंडे यांच्याकडे सोपवायची असु शकते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाकडून या निर्णयाचे स्वागत आहे, असेही चंद्रकांत पाटलांनी सांगितले.


दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यसभा तसेच विधान परिषदेसाठीही पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र राज्यसभेतही पंकजा यांना उमेदवारी डावलण्यात आली. राज्यसभेसाठी भाजपाने पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्यांना उमेदवारी मिळाली, त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली होती. मात्र आता विधान परिषदेसाठीही पंकजा यांना डावलण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला