पंकजाताईंच्या उमेदवारीसाठी आम्ही खूप प्रयत्न केले

मुंबई : विधान परिषदेसाठी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. आमच्या पार्टीत सर्वजण कोरी पाकीट असतो. जो पत्ता लिहील तिथे जावे लागते. त्यामुळे राजकारणात चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते आणि निर्णय हे शेवटी पक्षाचे असतात. त्यामुळे केंद्राने केलेला निर्णय हा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून सर्वांनी त्याचे पालन करायचे असते. पंकजा ताई यांच्या उमेदवारीसाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. मात्र केंद्राने काही भविष्यातील विचार करुन हा निर्णय घेतला असावा, अशी प्रतिक्रीया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी घोषित केल्यानंतर दिली.


आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या निवडणुकीसाठी पंकजा मुंडेंचा पत्ता कट केला आहे का? या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, पंकजा मुंडेंसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आणि आम्ही खूप प्रयत्न केले. मात्र मुंडे यांच्याऐवजी भाजपाकडून उमा खापरे यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे.


पुढे ते म्हणाले, ईच्छा व्यक्त करणे आणि नाराजी व्यक्त करणे यात काही गैर नाही. मात्र भाजपातील नाराजी लगेच भरली जाते. पंकजा मुंडे यांच्याकडे सध्या उत्तर प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. आणखी कोणतीतरी जबाबदारी संघटनेला पंकजा मुंडे यांच्याकडे सोपवायची असु शकते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाकडून या निर्णयाचे स्वागत आहे, असेही चंद्रकांत पाटलांनी सांगितले.


दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यसभा तसेच विधान परिषदेसाठीही पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र राज्यसभेतही पंकजा यांना उमेदवारी डावलण्यात आली. राज्यसभेसाठी भाजपाने पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्यांना उमेदवारी मिळाली, त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली होती. मात्र आता विधान परिषदेसाठीही पंकजा यांना डावलण्यात आले आहे.

Comments
Add Comment

प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये ५१ टक्के मतांचा संकल्प करा - बावनकुळे

नागपूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक सर्कल मध्ये ५१ टक्के मते मिळतील असा संकल्प करा, असे आवाहन

मुंबईसह विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे : मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष

पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू, अपघाताने २३ वाघांचा मृत्यू

चंद्रपूर : मागील पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात नैसर्गिक मृत्यू असले तरी,

शनिवार वाड्यावर नमाज पठण, निषेधासाठी भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन

पुणे : शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून

शनिवार वाड्यात नमाज पठण? ऐन दिवाळीत पुण्यात वादाची ठिणगी !

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार

तोच फोटो ठरला शेवटची आठवण, एकाचवेळी झाला सात मित्रांचा मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंना