मुंबई : दिल्लीहून परतलेले भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईत येताच तातडीने त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आज सकाळीच ते राज ठाकरे यांच्या ‘शिवतिर्थ’ बंगल्यावर दाखल झाले. यामुळे महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलेच पेटलेले असताना एकही मत फुटू नये यासाठी सर्व पक्ष काळजी घेत असल्याचे दिसून येते.
राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकमेव आमदार आहे. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले. अद्याप मनसेच्य़ा मतासाठी त्यांना महाविकास आघाडीकडून कोणीही संपर्क केला नव्हता. त्यामुळे भाजपने संधी साधत मनसेचे एकमेव मत स्वत:कडे ओढून घेतले आहे.
देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्याने त्यांच्या फिरण्यावर बंधने आल्याने भाजपच्या वतीने प्रसाद लाड यांना मुंबईतील आमदारांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर गिरीष महाजन यांच्यावर उर्वरित राज्यातील आमदारांना गळाला लावण्याची जबाबदारी आहे. महाजन यांनी तत्काळ पालघरच्या हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपसाठी संकटमोचन होण्याचे काम ते करत आहेत.
अलिकडच्या काळात मनसे आणि भाजपमध्ये हिंदूत्वावरून बैठका वाढल्या आहेत. येणाऱ्या निवडणुका दोन्ही पक्ष सोबत लढण्याची शक्यता आहे. मनसेचा प्रभाव असणाऱ्या महापालिका प्रभागांमध्ये भाजपकडून साटंलोटं होण्याची शक्यता आहे.
मनसेचे एकमेव मत भाजपच्या धनंजय महाडिक यांना द्यावे, म्हणून भाजपतर्फे प्रयत्न सुरू आहेत यासाठी आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…