रजा अकादमी, पीएफआयचे काय?

मुंबई : काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यावरुन आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.


मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची चिंता आहे. मात्र, हिंदूंना राज्यात रजा अकादमी आणि पीएफआय सारख्या संघटनांकडून नेहमीच लक्ष केले जाते त्याचे काय?, अशी टीका राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, हिंदूंना राज्यात रजा अकादमी आणि पीएफआय सारख्या संघटनांकडून नेहमीच लक्ष केले जाते त्याचे काय? काश्मीर पंतप्रधान मोदींच्या हातात सुरक्षित आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका, असा खोचक टोला राणेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.


https://twitter.com/NiteshNRane/status/1533269272738557954

त्यामुळे नितेश राणेंच्या ट्विटनंतर पुन्हा काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून 'कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे टार्गेट किलिंग' काश्मीर खोऱ्यात सुरू आहे. मागील काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांची हत्या सुरु आहे. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यानी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती.

Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,