उद्धव ठाकरे, श्रीजी होम कंपनी कोणाची ? किरीट सोमैय्या यांचा सवाल

नाशिक (हिं.स) मुंबईच्या शिवाजी पार्क समोर उभी असलेली रिकामी इमारत आहे ती श्रीजी होम इमारत कोणाची आहे? श्रीजी होम्स कंपनी अजूनही रजिस्टर झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे साले श्रीधर पाटणकर, राहुल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी मिळून श्री जी होम्स ही बनवली. ईडी आणि संबंधित शासकीय यंत्रणाकडे सगळे कागदपत्र दिले आहेत. त्यामूळे यातील सत्य लवकरच बाहेर येईल, अन् दोषिना सजा होईल असे भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.


नाशिक दौऱ्यावर आलेल्या सोमैय्या यांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयांत पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहराध्यक्ष गिरिश पालवे, आ. राहूल ढिकले, आ. सीमा हिरे, बाळा साहेब सानप, केदा आहेर, विजय साने, दिनकर पाटील, सुरेश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


सोमैय्या म्हणाले की, सचिन वाझे, बजरंग खरमाटे जर माफीचा साक्षिदार झाले आहेत. वाझेच्या वसुली मधून हॉटेल कॉन्टॅक्टर चे पैसे दिले अस जर वाझेनीच सांगितले तर ''तेरा क्या होगा कालिया'' असा टोला त्यांनी परब यांना लगावला. वाझेनी जर सांगितले की माझी नियुक्ती उद्धव ठाकरेंमुळे झाली तर सत्य बाहेर येईन. त्यामुळे उध्दव ठाकरे, अनिल परब यांच्यावर कारवाई अटळ आहे. बेईमान कोण सेनेचे आमदार, त्यांना समर्थन देणारे आमदार की नेते बेईमान हा खरा प्रश्न आहे.


राज्य शासनाच्या भ्रष्टाचारावर चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांचा घोडे बाजार महाराष्ट्रात सुरू झाला आहे. सरकारी यंत्रणा शासनाच्या तांब्यात आहेत त्यामुळे बाजार मंडणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी सोमैय्या यांनी केली.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या