राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली

  28

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून ही निवडणूक भाजप व महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जोडीला आणखी तीन आमदारांची रसद दिली असून रणनिती यशस्वी करण्यासाठी भाजपने पाचजणांवर विशेष मोहीम सोपविली आहे.


या निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये आणि भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी भाजपच्या वतीने भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे आमदारांची जबाबदारी देण्यात येणार आहे. नेमकी ही जबाबदारी काय असेल आणि त्यात कोण कोण आहेत याची रणनीती भाजपकडून आखण्यात आली असून त्याची विरोधकांना कल्पना येऊ नये यासाठी विशेष गोपनीयताही बाळगण्यात येत आहे.


राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने तिसरा उमेदवार मैदानात दिला आणि आता मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत तीनही उमेदवार विजयी करण्यासाठी भाजपला १४ मतांची गरज आहे. ही मते मिळविण्याची जबाबदारी भाजपने दिग्गज नेत्यांवर दिली आहे. या निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भाजपने ही मोहीम फत्ते करण्यासाठी त्रिमूर्तींवर विशेष जबाबदारी दिली आहे. गिरीश महाजन, आशीष शेलार, प्रसाद लाड या तीनजणांचा रणनिती अभियानामध्ये फडणवीस व पाटील यांच्यासह सहभाग करून घेतला आहे. अपक्ष आणि मित्रपक्षांच्या मदतीने भाजपचे संख्याबळ ११२ आहे.


भाजपचे दोन उमेदवार निवडून येऊन भाजपकडे २८ मते राहतात तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपला १४ मतांची गरज आहे. ती जुळवणे भाजपसाठी मोठे आव्हान असेल. भाजप सत्तेत असताना गिरीश महाजन यांची संकटमोचक म्हणून ओळख होती. आता हाच पत्ता राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने वापरायचा ठरवला आहे, तर गेल्यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत आशीष शेलार यांनी चमकदार कामगिरी केली होती. आता त्यांना राज्यसभेची मोहीम दिली आहे, तर निवडणुकांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी प्रसाद लाड यांच्यावर देण्यात आली आहे. आता हे त्रिमूर्ती भाजपला विजय मिळवून देतात का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

BMC: महापालिकेच्या वतीने सुमारे २० हजार कोटींचा वातावरणीय अर्थसंकल्प

यंदा बेस्टचा समावेश, भविष्यात इतर प्राधिकरणे आणि मंडळांचाही होणार विचार मुंबई (खास प्रतिनिधी) : पर्यावरण

बीएमसीच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार शैक्षणिक साहित्य

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या साडेतीन लाख

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२,७१,२९५ विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई: राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे

लोकलमधून उडी मारल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

मुंबई : पश्चिम रेल्वेवर असलेल्या मुंबई सेंट्रल स्टेशनवर एका २७ वर्षीय प्रवाशाचा चुकीच्या बाजूला उतरण्याच्या

चर्चगेट स्टेशनवर मोंजिनीस शॉपला आग, प्रवाशांमध्ये खळबळ!

मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकात गुरुवारी सायंकाळी एक भीषण घटना घडली. स्टेशनच्या आत असलेल्या 'मोंजिनीस केक शॉप'

मुंबईत बीकेसीतील सेबी भवनात अजगरांच्या पिलांचा सुळसुळाट

मुंबई : यंदा मान्सूनचे आगमन मे महिन्यातच झाले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. यामुळे जशी