महाड (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावानजीक एक कार एसटी बसवर आदळून झालेल्या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले. सर्व जखमी एकाच कुटुंबातील आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यात एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
शनिवारी सायंकाळी (एमएच ०२० बीएल ३२२६) या क्रमांकाची एसटी बस मुंबईहून महाडकडे येताना केंबुर्लीनजीक रत्नागिरीहून मुंबईकडे जाणारी (एमएच ०१ बीयू ३८११) या क्रमांकाची कार चुकीच्या दिशेने जात या बसवर आदळली. या अपघातात कारचालक सचिन लिगम (वय ३८), सानिका लिगम (वय ३५), आराध्य लिगम (८), अथर्व लिगम (वय १३) आणि गुणाजी लिगम (वय ७५) हे पाच जण जखमी झाले. यापैकी सानिका आणि आराध्य हे गंभीर असून त्यांना मुबई येथे हलविण्यात आले आहे. लिगम कुटुंब हे रत्नागिरी जिल्ह्यातील हसोळ येथे रहिवासी असून ते मुंबईत वास्तव्याला आहे.
अपघाताची माहिती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मिलींद खोपडे आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक मोकळी केली.
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…
राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…
प्रा. देवबा पाटील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक असल्याने त्यांना विज्ञानाच्या सर्वच गोष्टी माहीत होत्या. ते…