कारची एसटीला धडक पाच जखमी, दोन चिंताजनक

महाड (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावानजीक एक कार एसटी बसवर आदळून झालेल्या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले. सर्व जखमी एकाच कुटुंबातील आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यात एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.


शनिवारी सायंकाळी (एमएच ०२० बीएल ३२२६) या क्रमांकाची एसटी बस मुंबईहून महाडकडे येताना केंबुर्लीनजीक रत्नागिरीहून मुंबईकडे जाणारी (एमएच ०१ बीयू ३८११) या क्रमांकाची कार चुकीच्या दिशेने जात या बसवर आदळली. या अपघातात कारचालक सचिन लिगम (वय ३८), सानिका लिगम (वय ३५), आराध्य लिगम (८), अथर्व लिगम (वय १३) आणि गुणाजी लिगम (वय ७५) हे पाच जण जखमी झाले. यापैकी सानिका आणि आराध्य हे गंभीर असून त्यांना मुबई येथे हलविण्यात आले आहे. लिगम कुटुंब हे रत्नागिरी जिल्ह्यातील हसोळ येथे रहिवासी असून ते मुंबईत वास्तव्याला आहे.


अपघाताची माहिती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मिलींद खोपडे आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक मोकळी केली.

Comments
Add Comment

सलग १५ दिवस बीट ज्युस प्यायल्यास होणार 'या' ५ लोकांना आरोग्यदायी फायदे

बीट हे एक पोषकद्रव्यांनी भरलेले कंदमूळ आहे, जे डाएटमध्ये समाविष्ट केल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

हिट अँड रन, भरधाव बोलेरोने दोन तरुणींना उडवले

अमरावती : महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 'हिट अँड रन'ची घटना घडली. भरधाव

एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी तीन संघाची लागणार ताकद, भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान

मुंबई: क्रिकेट विश्वातील एकदिवसीय महिला विश्वचषकच्या यावर्षीच्या स्पर्धेत आतापर्यंत २२ सामने पार पडले आहेत. हा

बिल गेट्स यांची हिंदी टीव्हीवर एन्ट्री! ‘क्योंकी सास भी कभी बहू थी २’ मध्ये करणार खास कॅमिओ

Bill Gates: हिंदी मनोरंजन विश्वातून एक भन्नाट बातमी समोर आली आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात

लाडक्या बहिणीला काय गिफ्ट द्यायचं? 'या' 5 हटके आयडियाजने द्या जबरदस्त सरप्राईज

भावाबहिणीच्या प्रेमळ नात्याचे प्रतीक असलेला भाऊबीज हा सण दिवाळीनंतर लगेच साजरा केला जातो. यंदा हा सण २३ ऑक्टोबर

जे.जे.हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या मुलांनी साकारला किल्ला

मुंबई : दिवाळीत किल्ला बनवण्यामागे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा आदर करणे, शौर्य आणि