देशमुख, मलिकांच्या मतदानासाठी राष्ट्रवादी न्यायालयात जाणार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणूक भाजप व महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे. त्यामुळे हक्काचे मतदार असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात धाव घेणार आहे. यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.


अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस यासाठी कामाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यासाठी न्यायालयात जाणार असून नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणार आहोत. मागील काळातही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यावेळी त्यांना मतदानाची परवानगी देण्यात आली होती. रमेश कदम आणि छगन भुजबळ यांनाही अशा प्रकारची परवानगी मिळाली होती. प्रयत्न करणे आमच्या हातामध्ये आहे, तो आम्ही कसोशीने करण्याचा प्रयत्न करू.


भाजपचे दोन उमेदवार, महाविकास आघाडीचे प्रत्येकी एक असे ५ उमेदवार निवडून येणार आहेत. आता सहाव्या जागेचे चित्र ३ तारखेला स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.