गुन्हेगारीने पुन्हा काढले डोके वर; महिन्यात १७ जणांची हत्या

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून एकूण १७ जणांची हत्या घडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या सर्व हत्या अतिशय किरकोळ कारणांवरून घडल्याचे स्पष्ट होत आहे.


शहर व ग्रामीण पोलीस गुन्हेगारीचा आलेख कमी असल्याचे सांगत असले तरी खून, विनयभंग, घरफोड्या, वाहनचोऱ्या व चेनस्नॅचिंगच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांकडून केला जाणारा दावा फोल ठरत आहे. यामध्ये नाशिक शहरात दोन आठवड्यात तब्बल सहा खुनाच्या घटना घडल्या आहेत. तर नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या महिनाभरात १० खुनाच्या घटना घडल्या.


अशा एकूण १७ जणांची हत्या घडली आहे. विशेष म्हणजे या सर्व कौटुंबिक वाद, शुल्लक कारण यातूनच या घटल्याचे सामजते. पोलिसांचा धाक किती आहे हे यावरून स्पष्ट होते.


दरम्यान, झालेल्या एकूण हत्या या मागील भांडणाची कुरापत, मध्यस्थी केल्याने, तसेच अनैतिक संबध, पती-पत्नीतील वाद व लुटमारीच्या उद्देशाने झाल्या असून, सर्वच प्रकरणातील संशयित मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस दलाकडून सातत्याने गुन्हेगारांवर विविध प्रकारची कारवाई केली जात आहे परंतु पोलिसांचे धाक हा नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये राहिला नसल्याचे समोर येत आहे त्यामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागली आहे.
Comments
Add Comment

महाराष्ट्र भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक फेरबदल केले आहे.

संगमनेरमध्ये शिवजयंतीच्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

एकाला अटक ; शहरात भीतीचे वातावरण संगमनेर : संगमनेर शहरात जुन्या वादातून एका तरुणावर पाच जणांच्या टोळक्याने कोयता

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान; आंब्याच्या बागांनाही अवकाळीचा फटका

बीड : बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी,गारा कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण

Nagpur News : बारावी पेपरफूटी प्रकरणी आणखी दोघांना अटक

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे सुरू असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील

Navnath Ban: नगरसेवक नवनाथ बन यांची भाजपच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती

मुंबई: मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कोंढा या छोट्याशा गावातून देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईपर्यंतचा

Pune: पुण्यातील 'या' वाहतूक मार्गात बदल; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश

पुणे: पंडित प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे मौजे रामलिंग रोड, शिरुर येथे आयोजन करण्यात आलं असून २४