गुन्हेगारीने पुन्हा काढले डोके वर; महिन्यात १७ जणांची हत्या

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून एकूण १७ जणांची हत्या घडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या सर्व हत्या अतिशय किरकोळ कारणांवरून घडल्याचे स्पष्ट होत आहे.


शहर व ग्रामीण पोलीस गुन्हेगारीचा आलेख कमी असल्याचे सांगत असले तरी खून, विनयभंग, घरफोड्या, वाहनचोऱ्या व चेनस्नॅचिंगच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांकडून केला जाणारा दावा फोल ठरत आहे. यामध्ये नाशिक शहरात दोन आठवड्यात तब्बल सहा खुनाच्या घटना घडल्या आहेत. तर नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या महिनाभरात १० खुनाच्या घटना घडल्या.


अशा एकूण १७ जणांची हत्या घडली आहे. विशेष म्हणजे या सर्व कौटुंबिक वाद, शुल्लक कारण यातूनच या घटल्याचे सामजते. पोलिसांचा धाक किती आहे हे यावरून स्पष्ट होते.


दरम्यान, झालेल्या एकूण हत्या या मागील भांडणाची कुरापत, मध्यस्थी केल्याने, तसेच अनैतिक संबध, पती-पत्नीतील वाद व लुटमारीच्या उद्देशाने झाल्या असून, सर्वच प्रकरणातील संशयित मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस दलाकडून सातत्याने गुन्हेगारांवर विविध प्रकारची कारवाई केली जात आहे परंतु पोलिसांचे धाक हा नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये राहिला नसल्याचे समोर येत आहे त्यामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागली आहे.
Comments
Add Comment

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या