भारताच्या महिला रायफल संघाला सुवर्णपदक

  94

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय महिला संघाने मंगळवारी अजरबैजानमधील बाकू येथे आयोजित ‘आयएसएसएफ’ विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. रमिता, ईलाव्हेनिल वालारिवान आणि श्रेया अग्रवालने अचूक नेम साधून महिलांच्या सांघिक १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेत भारताच्या पदकांचे खाते उघडले.


भारतीय महिला संघाने फायनलमध्ये डेन्मार्कचा १७-५ ने पराभव केला. त्यामुळे भारतीय महिला संघाला सोनेरी यश संपादन करता आले. सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय महिला त्रिकुटाने डेन्मार्कच्या अॅना निलसन, एमा कूच आणि रिकी माएंग इब्सनला १७-५ असे नमवले. या गटात पोलंड महिला संघ तिसऱ्या स्थानावर राहिला.


दुसरीकडे, महाराष्ट्राच्या युवा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलसह पार्थ मखिजा आणि धनुष श्रीकांत हे एअर रायफल टीम इव्हेंटमध्ये चौथ्या स्थानी राहिले. भारताच्या पुरुष संघाला या गटाच्या लढतीत क्रोएशियाकडून पराभव पत्कारावा लागला.


माजी अग्रमानांकित वालारिवान, रमिता आणि श्रेया यांनी सोमवारी दोन टप्प्यांच्या पात्रता फेरीतून अंतिम फेरीत धडक मारली होती. भारतीय महिलांनी पहिल्या टप्प्याच्या पात्रता फेरीत ९० फैरींमध्ये ९४४.४ गुणांची कमाई करत अव्वल स्थान मिळवले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात डेन्मार्कपाठोपाठ दुसरे स्थान मिळवत भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता.

Comments
Add Comment

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे