केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत !

मुंबई : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले जातात. त्याचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते.


केंद्र सरकारच्या निर्णयाचा फायदा सुमारे १.२५ कोटी लोकांना होणार आहे. केंद्र सरकार आता लवकरच महागाई भत्ता वाढवणार आहे, ज्याची कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकार महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


डीए आता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ अपेक्षित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलैपासून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असल्याचे मानले जात आहे. केंद्र सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र काही मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत.


केंद्र सरकारने डीए ५ टक्क्यांनी वाढवल्यास पगारात पूर्ण २७००० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता मानली जाते. केंद्र सरकार यावेळी महागाई भत्ता पूर्ण ४ टक्क्यांनी वाढवू शकते. यानंतर कर्मचाऱ्यांचा डीए ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के होईल. २०२२ च्या पहिल्या दोन महिन्यांत निर्देशांकात घसरण होईल.तो जानेवारीमध्ये १२.५ फेब्रुवारीमध्ये १२५ आणि मार्चमध्ये १२६ होता. एप्रिल, मे आणि जूनमध्ये १२६च्या वर राहिल्यास सरकार डीए ४ टक्क्यांनी वाढवू शकते.

Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :