सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा

Share

अकर्तेपणे करीत राहावे कर्म। हाच परमात्मा आपला करून घेण्याचा मार्ग॥ न करावा कोणाचा द्वेष मत्सर। सर्वांत पाहावा आपला रघुवीर॥ परनिंदा टाळावी। स्वतःकडे दृष्टी वळवावी॥ गुणांचे करावे संवर्धन। दोषांचे करावे उच्चाटन॥ जेथे जेथे जावे। चटका लावून यावे॥ याला उपाय एकच जाण। रघुनाथावांचून न आवड दुजी जाण॥ देहाचे दुःख अत्यंत भारी। रामकृपेने त्याची जाणीव दूर करी॥ मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम। हे पूर्ण जाणून, की माझा त्राता राम॥ अभिमान नसावा तिळभरी। निर्भय असावे अंतरी॥ जे दुःख देणे आले रामाचे मनी। ते तू सुख मानी॥ देह टाकावा प्रारब्धावर। आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर॥ मी असावे रामाचे। याहून जगी दुसरे न दिसावे साचे॥ प्रपंचातील सुखदुःख ठेवावे देहाचे माथा। आपण न सोडावा रघुनाथा॥ आपण नाही म्हणू कळले जाण। ज्ञानाचे दाखवावे अज्ञान॥ दोष न पाहावे जगाचे। आपले आपण सुधारून घ्यावे साचे॥ कोणास न लावावा धक्का। हाच नेम तुम्ही राखा॥ एक रामसेवा अंतरी। सर्वांभूती भगवद्भाव धरी॥ राम ज्याचा धनी। त्याने न व्हावे दैन्यवाणी॥ नका मागू कुणा काही। भाव मात्र ठेवा रामापायी॥ वाईटांतून साधावे आपले हित। हे ठेवावे मनी निश्चित॥ भगवंताचे विस्मरण । हे वस्तूच्या मोहाला कारण॥ म्हणून भक्ती व नाम। याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान॥ परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाणे। त्यातच त्यास पाहावे आपण॥ सर्व कर्ता राम हा भाव ठेवता चित्ती। खऱ्या विचारांची जोडेल संगती ॥ व्यवहारातील लाभ आणि हानि। मनापासून आपण न मानी॥ मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी। सुखाने वर्तत जावे जनी॥ एकच क्षण ऐसा यावा । जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा॥ रामाविण उठे जी जी वृत्ती । त्यासी आपण न व्हावे सांगाती॥ मी रामाचा हे जाणून । वृत्ती ठेवावी समाधान॥ धन्य मी झालो। रामाचा होऊन राहिलो। ही बनवावी वृत्ती। जेणे संतोषेल रघुपती । वृत्ती बनविण्याचे साधन। राखावे परमात्म्याचे अनुसंधान॥ शरीरसंपत्ती क्षीण झाली। तरी वृत्ती तशी नाही बनली॥ विषयाधीन जरी होय वृत्ती। तरी दुरावेल तो रघुपती ॥ संतांची जेथे वस्ती। तेथे आपली ठेवावी वृत्ती॥

– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

Recent Posts

Jio युजर्सला हवे Unlimited 5G डेटा, इतके रुपयांचा करावा लागेल रिचार्ज

मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…

6 hours ago

IND vs ZIM: अभिषेक-गायकवाडचे वादळ, आवेश-मुकेशचा कहर, झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले

मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…

7 hours ago

१००० कोटीहून अधिक नेटवर्थ…क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…

8 hours ago

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

10 hours ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

11 hours ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

11 hours ago