जुने कपडे विकण्यासाठी गमावले तब्बल साडेआठ लाख रुपये

पनवेल (वार्ताहर) : ओएलएक्सच्या माध्यमातून जुने कपडे विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका उच्चशिक्षित महिलेला अज्ञात सायबर चोरट्याने तब्बल ८ लाख ५ हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.


खारघर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. फसवणूक झालेली ३७ वर्षीय महिला खारघर येथे वडिलांकडे राहते. ती एका कंपनीत सिनीयर कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. या महिलेने आपले जुने कपडे विकण्यासाठी ओएलएक्सवर त्याचे फोटो अपलोड केले होते.


काही दिवसांतच एका सायबर चोरट्याने या महिलेला संपर्क साधून त्याचे अंधेरी येथे फर्निचर आणि जुन्या कपड्यांचे दुकान असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडील कपडे विकत घेण्याची तयारी दर्शवून कपड्यांचे फोटो मोबाईलवर पाठविण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने मोबाईलवर आपल्या जुन्या कपड्यांचे फोटो पाठवले.


त्यानंतर सायबर चोरट्याने कपडे घेण्यासाठी मुलाला त्यांच्या घरी पाठविण्याचा आणि पेटीएमद्वारे पैसे पाठविण्याचा बहाणा केला. सुरुवातीला त्याने महिलेला २ रुपयांचा एक क्युआर कोड पाठवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तो क्युआर कोड महिलेने स्कॅन केले असता, तिच्या खात्यातून पैसे जाण्यास सुरुवात झाली.


अशा पद्धतीने चोरट्याने महिलेला ११ वेळा क्युआर कोड पाठवून ते स्कॅन करण्यास भाग पाडून तिच्या खात्यातून तब्बल ८ लाख ५० हजार रुपये उकळले. आपली फसवणूक होत असल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने बँकेशी संपर्क साधून बँक खाते ब्लॉक केले.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात