ठाणे (प्रतिनिधी) : लिंबाच्या महागाईनंतर सध्या भाजी मंडईत टोमॅटो भाव खात असून टोमॅटोच्या रेटची स्पर्धा थेट पेट्रोल-डिझेलशी सुरू असल्याचे दिसत आहे. भाजी मंडईत टोमॅटोचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मान्सूनपूर्व पावसामुळे महाराष्ट्रातील पुणे आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या कारणास्तव काढणीही पुढे ढकलण्यात आली. त्याचा परिणाम टोमॅटो पिकावर स्पष्टपणे दिसून येत आहे. भाजी मंडईत सध्या इतर भाज्यांच्या तुलनेत टोमॅटोची आवक नगण्य आहे. त्याचप्रमाणे बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या टोमॅटोचा दर्जा उत्तम नाही. खराब झालेला किंवा कच्चा टोमॅटो बाजारात विक्री साठी येत आहे.
उत्तम प्रतीच्या टॉमेटोला मागणी चांगली आहे; परंतु टोमॅटो १०० रुपये किलोने विकला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भाज्या विशेषतः टोमॅटोच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा टोमॅटोचे भाव गगनाला भिडू शकतात.
टोमॅटोचा भाव १०० रुपयांच्या पुढे
मागील वर्षी याच काळात टोमॅटो ६० रुपये किलोने विकला जात होता आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भावात १०० रुपयांनी वाढ झाली होती. यानंतर भाव १० रुपये किलोपर्यंत खाली आले. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या हंगाम बंद असल्याने टोमॅटो लागवडीखालील जमीन कमी आहे. टोमॅटो काढणीचा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस आणि कमी लागवडीचा परिणाम भाव वाढण्यावर झाला आहे.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…