१७ गावांवर पुन्हा पाण्याचे संकट...

पाच दिवस काम चालू राहणार असल्याने गावांचा पाणीपुरवठा बं


सफाळे (वार्ताहर) : पालघर तालुक्यातील केळवे रोड पूर्व भागात असलेल्या झांझरोळी धरणाअंतर्गत असणाऱ्या १७ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा गाळ काढण्याचे काम गुरुवारपासून हाती घेण्यात आले असल्यामुळे सतरा गावांचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद राहणार असल्याने नागरिकांना पुन्हा पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे.


याआधीही धरण दुरुस्तीच्या दरम्यान काही दिवस पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ ओढवली. झांझरोळी धरणातून १७ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा गाळ गेल्या अनेक वर्षांपासून काढला नव्हता. त्यामुळे या विहिरीत सुमारे पंधरा ते वीस फूट गाळ जमा झाला असून विहिरीत जमलेला गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा गाळ सोमवारपर्यंत काढण्यात येणार असल्याने ऐन उन्हाळ्यात सतरा गावांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये पाण्याची भूजल पातळी खाली गेल्याने अनेकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. काही गावे, पाडे खाडीकिनारी असल्याने बोअरवेल किंवा विहिरींना खारे पाणी लागते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी झाझंरोळी धरणावरच अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. गेले अनेक दिवस पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे सामाजिक संस्थेमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.


झांझरोळी धरणाचे दोन महिन्यांपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने १७ गावांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. झांझरोळी धरणातून पश्चिमेकडील माहीम, केळवे, दातिवरे, माकुणसार, आगरवाडी, एडवण, विळंगी, कोरे, भादवे, मधुकरनगर आदी १७ गावांना आता पुन्हा पाणीपुरवठा होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.


गुरुवारी विद्युत बिल न भरल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्याने तुर्तास पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र वीज जोडणी सुरू केली असली तरी मुख्य विहीर साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याने हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा शाखा अभियंता प्रशांत इंगळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

उठाबशा काढायला सांगणाऱ्या शिक्षिकेला शिक्षा!

ममता यादववर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल वसई : उठाबशा काढण्यास सांगितल्यामुळे वसईच्या एका शाळेतील मुलीचा

Vasai News : 'मामा माझ्याशी लग्न कर', भाचीचा तगादा जीवावर! आईच्या सख्ख्या भावासोबतचं अफेअर; लोकल ट्रेनमध्ये झालेल्या वादाचा भयावह शेवट

मुंबई : वसईतील सातवली परिसरात अपहरण झालेल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली

पालघर नगरपरिषद निवडणुकीत आघाडीत बिघाडी !

महायुतीमध्येही पडली उभी फूट पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या तीन नगरपरिषदेसह एका नगरपंचायत

पालघरमध्ये पक्ष्यांच्या प्रजाती होत आहेत दुर्मीळ

मोखाडा : सूर्याची किरण पडताच पक्षाच्या किलबिलाटाने रमणीय होणारी पहाट आता हरवत चालली आहे. गवताळ डोंगराळ भागात

मच्छीमारांना आता क्यूआर कोडचे ओळखपत्र

हानिकारक मासेमारीवर बंदी नवीन नियमानुसार, एलईडीद्वारे मासे पकडणे, पेयर ट्रॉलिंग आणि बुल ट्रॉलिंगसारख्या

पालघर नगर परिषदेत तिरंगी लढतीची चिन्हे!

मोबिन शेख पालघर : आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढली असून तिरंगी लढतीचे संकेत