Categories: पालघर

१७ गावांवर पुन्हा पाण्याचे संकट…

Share

पाच दिवस काम चालू राहणार असल्याने गावांचा पाणीपुरवठा बं

सफाळे (वार्ताहर) : पालघर तालुक्यातील केळवे रोड पूर्व भागात असलेल्या झांझरोळी धरणाअंतर्गत असणाऱ्या १७ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा गाळ काढण्याचे काम गुरुवारपासून हाती घेण्यात आले असल्यामुळे सतरा गावांचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद राहणार असल्याने नागरिकांना पुन्हा पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

याआधीही धरण दुरुस्तीच्या दरम्यान काही दिवस पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ ओढवली. झांझरोळी धरणातून १७ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा गाळ गेल्या अनेक वर्षांपासून काढला नव्हता. त्यामुळे या विहिरीत सुमारे पंधरा ते वीस फूट गाळ जमा झाला असून विहिरीत जमलेला गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा गाळ सोमवारपर्यंत काढण्यात येणार असल्याने ऐन उन्हाळ्यात सतरा गावांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये पाण्याची भूजल पातळी खाली गेल्याने अनेकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. काही गावे, पाडे खाडीकिनारी असल्याने बोअरवेल किंवा विहिरींना खारे पाणी लागते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी झाझंरोळी धरणावरच अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. गेले अनेक दिवस पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे सामाजिक संस्थेमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.

झांझरोळी धरणाचे दोन महिन्यांपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने १७ गावांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. झांझरोळी धरणातून पश्चिमेकडील माहीम, केळवे, दातिवरे, माकुणसार, आगरवाडी, एडवण, विळंगी, कोरे, भादवे, मधुकरनगर आदी १७ गावांना आता पुन्हा पाणीपुरवठा होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.

गुरुवारी विद्युत बिल न भरल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्याने तुर्तास पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र वीज जोडणी सुरू केली असली तरी मुख्य विहीर साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याने हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा शाखा अभियंता प्रशांत इंगळे यांनी सांगितले.

Recent Posts

Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं! चक्क महिला पोलिसाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

आरोपीला तात्काळ अटक पुणे : पुण्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी काही थांबायचे नाव घेत नाही.…

41 mins ago

Nagpur News : पत्नीच्या उपचारासाठी पैशांची चणचण; पतीने उचलले धक्कादायक पाऊल!

नागपूर : केरळ (Keral) राज्यातून आलेल्या कॅन्सर (Cancer) पीडित पत्नीच्या उपचारासाठी एक कुटुंब नागपूर शहरात…

41 mins ago

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

12 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

13 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

13 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

14 hours ago