१७ गावांवर पुन्हा पाण्याचे संकट...

पाच दिवस काम चालू राहणार असल्याने गावांचा पाणीपुरवठा बं


सफाळे (वार्ताहर) : पालघर तालुक्यातील केळवे रोड पूर्व भागात असलेल्या झांझरोळी धरणाअंतर्गत असणाऱ्या १७ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा गाळ काढण्याचे काम गुरुवारपासून हाती घेण्यात आले असल्यामुळे सतरा गावांचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद राहणार असल्याने नागरिकांना पुन्हा पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे.


याआधीही धरण दुरुस्तीच्या दरम्यान काही दिवस पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ ओढवली. झांझरोळी धरणातून १७ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा गाळ गेल्या अनेक वर्षांपासून काढला नव्हता. त्यामुळे या विहिरीत सुमारे पंधरा ते वीस फूट गाळ जमा झाला असून विहिरीत जमलेला गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा गाळ सोमवारपर्यंत काढण्यात येणार असल्याने ऐन उन्हाळ्यात सतरा गावांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये पाण्याची भूजल पातळी खाली गेल्याने अनेकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. काही गावे, पाडे खाडीकिनारी असल्याने बोअरवेल किंवा विहिरींना खारे पाणी लागते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी झाझंरोळी धरणावरच अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. गेले अनेक दिवस पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे सामाजिक संस्थेमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.


झांझरोळी धरणाचे दोन महिन्यांपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने १७ गावांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. झांझरोळी धरणातून पश्चिमेकडील माहीम, केळवे, दातिवरे, माकुणसार, आगरवाडी, एडवण, विळंगी, कोरे, भादवे, मधुकरनगर आदी १७ गावांना आता पुन्हा पाणीपुरवठा होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.


गुरुवारी विद्युत बिल न भरल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्याने तुर्तास पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र वीज जोडणी सुरू केली असली तरी मुख्य विहीर साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याने हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा शाखा अभियंता प्रशांत इंगळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

‘हॅप्पी न्यू इयर’चा एक मेसेज करू शकतो बँक खाते रिकामे

सफाळे पोलिसांकडून सायबर स्कॅमबाबत हाय अलर्ट सफाळे : नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र असतानाच, सायबर

नवली उड्डाणपुलावर पतंगाच्या मांज्यामुळे अपघात

पालघर : पालघर शहरातील नवली येथील नवीन ब्रिजवरून प्रवास करत असताना पतंगाच्या धारदार मांज्यामुळे एका तरुणाचा कान

भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्षांना संधी

संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता

११५ जागांसाठी ९४९ उमेदवारी अर्ज दाखल

शेवटच्या दिवशी इच्छुकांची एकच गर्दी विरार : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिलेल्या

बोईसरकरांच्या प्रतिसादाने पास्थळचे ‘आंबटगोड’ मैदान दुमदुमले

‘दैनिक प्रहार’ पुरस्कृत पास्थळ महोत्सव २०२५ पालघर : पालघर तालुक्यातील पास्थळ येथील 'जाणता राजा फाऊंडेशन' आणि

६२१ कोटी खर्चूनही मुंबई-अहमदाबाद महामार्ग खड्ड्यांतच!

व्हाईट टॉपिंगच्या निकृष्ट कामामुळे वाहतूक कोंडी वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी