मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध बोलले तर पाच दहा ठिकाणच्या जेलमध्ये जावे लागते - देवेंद्र फडणवीस

नागपूर : कोणी हनुमान चालिसा म्हणण्याला विरोध करत असेल तर ते अतिशय अयोग्य आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या, सत्तारुढ पक्षांच्या विरुद्ध एक अक्षर जरी बोललो तरी तुम्हाला पाच दहा ठिकाणच्या जेलमध्ये जावे लागते. पण देशाच्या पंतप्रधानांबद्दल कोणतीही भाषा वापरली तरी अशी भाषा वापरणाऱ्यांचे महाराष्ट्रामध्ये स्वागत केले जाते, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.


तसेच कुणी हनुमान चलिसा पठण करत असेल तर रोखता येत नाही. कोणी जर रोखत असेल तर ते चुकीचे आहे. पण भारतात, महाराष्ट्र वा नागपूरमध्ये हनुमान चालीसावर कोणीही बंदी लावू शकत नाही. त्यामुळे या संदर्भात राजकारण करण्याचे काम नाही. ज्यांना हनुमान चालीसा पठण करायचे आहे त्यांना करू द्या असे मत नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. राणा दांपत्याचे समर्थनात लागलेल्या फलकावर भाजपाच्या मोठ्या नेत्यांचे छायाचित्र दिसून आले यावर विचारले असता, फलक जर सकारात्मक आहे काही हरकत नाही. मात्र नकारात्मक फलकवार छायाचित्र लावू नका अशी विनंती केली असल्याचेही ते म्हणाले.


“भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा नागपूरमध्ये कुठेही हनुमान चालिसा म्हणण्यावर बंदी नाही. कोणी हनुमान चालिसा म्हणण्याला विरोध करत असेल तर ते अतिशय अयोग्य आहे. सगळ्यांनी योग्य भाषेचा वापर केला पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून केंद्र सरकारला मसणात जावे लागेल असे म्हटल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. “महाराष्ट्रामध्ये आता कायदा असा आहे की, मुख्यमंत्र्यांच्या, सत्तारुढ पक्षांच्या विरुद्ध एक अक्षर जरी बोललो तरी तुम्हाला पाच दहा ठिकाणच्या जेलमध्ये जावे लागते. पण देशाच्या पंतप्रधानांबद्दल कोणतीही भाषा वापरली तरी अशी भाषा वापरणाऱ्यांचे महाराष्ट्रामध्ये स्वागत केले जाते. हीच परंपरा महाराष्ट्राने कायम केली आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक