मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध बोलले तर पाच दहा ठिकाणच्या जेलमध्ये जावे लागते - देवेंद्र फडणवीस

नागपूर : कोणी हनुमान चालिसा म्हणण्याला विरोध करत असेल तर ते अतिशय अयोग्य आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या, सत्तारुढ पक्षांच्या विरुद्ध एक अक्षर जरी बोललो तरी तुम्हाला पाच दहा ठिकाणच्या जेलमध्ये जावे लागते. पण देशाच्या पंतप्रधानांबद्दल कोणतीही भाषा वापरली तरी अशी भाषा वापरणाऱ्यांचे महाराष्ट्रामध्ये स्वागत केले जाते, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.


तसेच कुणी हनुमान चलिसा पठण करत असेल तर रोखता येत नाही. कोणी जर रोखत असेल तर ते चुकीचे आहे. पण भारतात, महाराष्ट्र वा नागपूरमध्ये हनुमान चालीसावर कोणीही बंदी लावू शकत नाही. त्यामुळे या संदर्भात राजकारण करण्याचे काम नाही. ज्यांना हनुमान चालीसा पठण करायचे आहे त्यांना करू द्या असे मत नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. राणा दांपत्याचे समर्थनात लागलेल्या फलकावर भाजपाच्या मोठ्या नेत्यांचे छायाचित्र दिसून आले यावर विचारले असता, फलक जर सकारात्मक आहे काही हरकत नाही. मात्र नकारात्मक फलकवार छायाचित्र लावू नका अशी विनंती केली असल्याचेही ते म्हणाले.


“भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा नागपूरमध्ये कुठेही हनुमान चालिसा म्हणण्यावर बंदी नाही. कोणी हनुमान चालिसा म्हणण्याला विरोध करत असेल तर ते अतिशय अयोग्य आहे. सगळ्यांनी योग्य भाषेचा वापर केला पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून केंद्र सरकारला मसणात जावे लागेल असे म्हटल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. “महाराष्ट्रामध्ये आता कायदा असा आहे की, मुख्यमंत्र्यांच्या, सत्तारुढ पक्षांच्या विरुद्ध एक अक्षर जरी बोललो तरी तुम्हाला पाच दहा ठिकाणच्या जेलमध्ये जावे लागते. पण देशाच्या पंतप्रधानांबद्दल कोणतीही भाषा वापरली तरी अशी भाषा वापरणाऱ्यांचे महाराष्ट्रामध्ये स्वागत केले जाते. हीच परंपरा महाराष्ट्राने कायम केली आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या