मुरुड समुद्रात तीन महिने डॉल्फिनचे दर्शन नाही

संतोष रांजणकर


मुरुड : मुरुड समुद्रामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून डॉल्फिनचे दर्शन झालेले नाही. अचानक डॉल्फिन दिसण्याचे बंद झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरल्याचे पाहावयास मिळत आहे. मुरुडचा जंजिरा किल्ला पाहण्या सोबत डॉल्फिन ही पाहण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. २६ मे पासून जंजिरा किल्ला पाहण्यासाठी बंद केल्यामुळे पर्यटक समुद्र किनारी आनंद घेण्यासाठी थांबत आहेत; परंतु डॉल्फिनचे दर्शन होत नसल्याने नाराज होऊन परतत आहेत. त्यामुळे डॉल्फिनचे संवर्धन व्हावे ही काळाची गरज आहे.


मानवाकडून बेजबाबदारपणे समुद्रात केले जाणारे धोकादायक प्रदूषण, प्रकल्पा अंतर्गत वाढणारी वर्दळ, समुद्रातील जलचरांच्या एक प्रकारे जीवावर उठल्याचे चित्र दिसत असून मासळीचे प्रमाण घटते आहे. समुद्र किनारपट्टीवर किंवा समुद्रात जलक्रीडेने नेहमी मोहित करणारे डॉल्फिन दिसत नसल्याने चिंतेचा विषय बनला आहे. पर्यटन वृद्धीसाठी पर्यटकांचे निखळ मनोरंजन करणारा आणि भारतीय नौदलामध्ये ‘देवदूत’ ही भावना असणारे डॉल्फिन आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. डॉल्फिनचे दर्शन होत नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे.


तीन महिन्यांपूर्वी मुरुड, एकदरा, दिघी, राजपुरी समुद्र खाडीत नेहमी समुद्रातून शिट्यांचा आवाज काढीत उसळी मारणाऱ्या डॉल्फिनच्या जलक्रीडांचे दर्शन अनेकांना होत असे; मात्र मुरुडच्या किनाऱ्यावर डॉल्फिन येणे बंद झाल्याने ही धोक्याचा सिग्नल तर नाही ना? असा प्रश्न डोकावू लागला आहे.


भविष्यात येणारा धोका ओळखण्यात डॉल्फिन माहीर असतात अशी माहिती एकदरा गाव महादेव कोळी समाज अध्यक्ष तथा मुरुड तालुका मच्छिमार कृती समिती अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी बोलताना दिली. डॉल्फिन पाण्यात विहार करताना मार्ग शोधण्यासाठी सोनार ध्वनी लहरींचा वापर करतात. डॉल्फिनला वाचविणे काळाची गरज असल्याने भारत सरकारने उपलब्ध डॉल्फिन वाचवून संवर्धनासाठी आधिक उपाययोजना गरजेचे आहे.

Comments
Add Comment

जिल्ह्यात दिवाळीसाठी ५० जादा गाड्या

प्रवाशांसाठी एसटी महामंडळाची सुविधा रायगड एसटी महामंडळाने दिवाळी धमाका म्हणून ५० जादा गाड्यांचे नियोजन केले

माणगाव-दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवा

माणगाव-दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या अवजड वाहतूक आणि अतिवृष्टीने पडलेले खड्डे भरून काढावेत

अलिबाग नगर परिषद प्रभाग आरक्षण जाहीर

महिलांसाठी अनुसूचित जातीसाठी १ जागा, तर अनुसूचित जमातीसाठी ३ जागा राखीव अलिबाग : अलिबाग नगर परिषदेच्या २०

श्रीवर्धन डेपोच्या बसगाड्यांचे अतिरिक्त थांबे रद्द करा

श्रीवर्धन (वार्ताहर) : श्रीवर्धन डेपोच्या बसला गोवा हायवेवरील सर्व थांबे देत असल्याने स्थानिक प्रवाशांना मोठ्या

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

ठाणे, नवी मुंबई, रायगडमधील कोळी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडले

ठाणे (प्रतिनिधी) : यंदा पावसाळी मासेमारीबंदी संपुष्टात आल्यानंतर १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारीच्या नव्या