मुरुड समुद्रात तीन महिने डॉल्फिनचे दर्शन नाही

संतोष रांजणकर


मुरुड : मुरुड समुद्रामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून डॉल्फिनचे दर्शन झालेले नाही. अचानक डॉल्फिन दिसण्याचे बंद झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरल्याचे पाहावयास मिळत आहे. मुरुडचा जंजिरा किल्ला पाहण्या सोबत डॉल्फिन ही पाहण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. २६ मे पासून जंजिरा किल्ला पाहण्यासाठी बंद केल्यामुळे पर्यटक समुद्र किनारी आनंद घेण्यासाठी थांबत आहेत; परंतु डॉल्फिनचे दर्शन होत नसल्याने नाराज होऊन परतत आहेत. त्यामुळे डॉल्फिनचे संवर्धन व्हावे ही काळाची गरज आहे.


मानवाकडून बेजबाबदारपणे समुद्रात केले जाणारे धोकादायक प्रदूषण, प्रकल्पा अंतर्गत वाढणारी वर्दळ, समुद्रातील जलचरांच्या एक प्रकारे जीवावर उठल्याचे चित्र दिसत असून मासळीचे प्रमाण घटते आहे. समुद्र किनारपट्टीवर किंवा समुद्रात जलक्रीडेने नेहमी मोहित करणारे डॉल्फिन दिसत नसल्याने चिंतेचा विषय बनला आहे. पर्यटन वृद्धीसाठी पर्यटकांचे निखळ मनोरंजन करणारा आणि भारतीय नौदलामध्ये ‘देवदूत’ ही भावना असणारे डॉल्फिन आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. डॉल्फिनचे दर्शन होत नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे.


तीन महिन्यांपूर्वी मुरुड, एकदरा, दिघी, राजपुरी समुद्र खाडीत नेहमी समुद्रातून शिट्यांचा आवाज काढीत उसळी मारणाऱ्या डॉल्फिनच्या जलक्रीडांचे दर्शन अनेकांना होत असे; मात्र मुरुडच्या किनाऱ्यावर डॉल्फिन येणे बंद झाल्याने ही धोक्याचा सिग्नल तर नाही ना? असा प्रश्न डोकावू लागला आहे.


भविष्यात येणारा धोका ओळखण्यात डॉल्फिन माहीर असतात अशी माहिती एकदरा गाव महादेव कोळी समाज अध्यक्ष तथा मुरुड तालुका मच्छिमार कृती समिती अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी बोलताना दिली. डॉल्फिन पाण्यात विहार करताना मार्ग शोधण्यासाठी सोनार ध्वनी लहरींचा वापर करतात. डॉल्फिनला वाचविणे काळाची गरज असल्याने भारत सरकारने उपलब्ध डॉल्फिन वाचवून संवर्धनासाठी आधिक उपाययोजना गरजेचे आहे.

Comments
Add Comment

अलिबाग नगरपालिकेचा १६१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

करवाढ नाही, विकासकामांना प्राधान्य : नगराध्यक्षा अक्षया नाईक अलिबाग : अलिबाग नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन

जिल्हा परिषदेत सत्तासमीकरणाची जुळवाजुळ

जिल्हाधिकारी कार्यालयात १२ मार्चला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया तालुकास्तरावर ११ मार्चला सभापती,

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी