बीडीडी चाळीत पोलिसांना मोफत घरे द्या

मुंबई (प्रतिनिधी) : बीडीडी चाळ पुनर्वसनात पोलिसांना हक्काची मोफत घरे द्या अशी मागणी करीत उपोषणाला बसलेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मागणीला समर्थन देत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते आमदार अॅड. आशीष शेलार या उपोषणात सहभागी झाले.


वरळीतील बीडीडी चाळीत अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने निवासस्थाने दिली त्याच पद्धतीने पोलिसांना मोफत निवासस्थाने द्या, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर हे करीत असून त्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज त्यांनी नायगाव येथे लाक्षणिक उपोषण केले. बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना घर घेण्यासाठी ५० लाख रुपये मोजावे लागणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले आहे. बीडीडी चाळीत राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काची घरे दिली.


बीडीडी चाळीचे पुनर्वसन करताना अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना जो न्याय लावला तोच न्याय पोलीस कर्मचाऱ्यांना लावला गेला पाहिजे, असे कोळंबकर यांचे म्हणणे असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना हक्काची घरे देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणे राज्य सरकारने पोलिसांना हक्काची घरे द्यावीत, असेही कोळंबकर यांचे म्हणणे आहे. आज त्यांच्या उपोषणात सहभागी होताना आमदार अॅड. आशीष शेलार यांनी सांगितले की, या मागणीला भाजपाचे मुंबईतील तिन्ही खासदार विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदार या सगळ्यांचा पाठिंबा असून पोलिसांसाठी जो संघर्ष कोळंबकर करीत आहेत त्या संघर्षात भाजप पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. ऐरवी शांत असणारे कालिदास कोळंबकर हे पोलीसांच्या घरासाठी मात्र विधानसभेत आक्रमक पवित्रा घेऊन लढले. त्यांनी ही लढाई जशी सभागृहात लढली तसेच ते आता रस्त्यावर ही लढत आहे. ही लढाई पोलीसांंसाठी आहे.


जे पोलीस कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून काम करीत होते त्यांच्यासाठी ही लढाई आहे. या उपोषणात पोलीस सहभागी झाले नाही त्यांनी कुठल्याही पक्षाच्या अशा व्यासपीठावर जाऊ ही नये, पण पोलिसांच्या पत्नी ज्या पद्धतीने यामध्ये सहभागी झाल्यात ती ताकद ठाकरे सरकारला अजून कळलेली नाही. हा इशारा आहे असे समजावे, असेही आमदार अॅड. आशीष शेलार म्हणाले.

Comments
Add Comment

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा