बीडीडी चाळीत पोलिसांना मोफत घरे द्या

  74

मुंबई (प्रतिनिधी) : बीडीडी चाळ पुनर्वसनात पोलिसांना हक्काची मोफत घरे द्या अशी मागणी करीत उपोषणाला बसलेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मागणीला समर्थन देत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते आमदार अॅड. आशीष शेलार या उपोषणात सहभागी झाले.


वरळीतील बीडीडी चाळीत अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने निवासस्थाने दिली त्याच पद्धतीने पोलिसांना मोफत निवासस्थाने द्या, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर हे करीत असून त्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज त्यांनी नायगाव येथे लाक्षणिक उपोषण केले. बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना घर घेण्यासाठी ५० लाख रुपये मोजावे लागणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले आहे. बीडीडी चाळीत राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काची घरे दिली.


बीडीडी चाळीचे पुनर्वसन करताना अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना जो न्याय लावला तोच न्याय पोलीस कर्मचाऱ्यांना लावला गेला पाहिजे, असे कोळंबकर यांचे म्हणणे असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना हक्काची घरे देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणे राज्य सरकारने पोलिसांना हक्काची घरे द्यावीत, असेही कोळंबकर यांचे म्हणणे आहे. आज त्यांच्या उपोषणात सहभागी होताना आमदार अॅड. आशीष शेलार यांनी सांगितले की, या मागणीला भाजपाचे मुंबईतील तिन्ही खासदार विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदार या सगळ्यांचा पाठिंबा असून पोलिसांसाठी जो संघर्ष कोळंबकर करीत आहेत त्या संघर्षात भाजप पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. ऐरवी शांत असणारे कालिदास कोळंबकर हे पोलीसांच्या घरासाठी मात्र विधानसभेत आक्रमक पवित्रा घेऊन लढले. त्यांनी ही लढाई जशी सभागृहात लढली तसेच ते आता रस्त्यावर ही लढत आहे. ही लढाई पोलीसांंसाठी आहे.


जे पोलीस कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून काम करीत होते त्यांच्यासाठी ही लढाई आहे. या उपोषणात पोलीस सहभागी झाले नाही त्यांनी कुठल्याही पक्षाच्या अशा व्यासपीठावर जाऊ ही नये, पण पोलिसांच्या पत्नी ज्या पद्धतीने यामध्ये सहभागी झाल्यात ती ताकद ठाकरे सरकारला अजून कळलेली नाही. हा इशारा आहे असे समजावे, असेही आमदार अॅड. आशीष शेलार म्हणाले.

Comments
Add Comment

BMC: महापालिकेच्या वतीने सुमारे २० हजार कोटींचा वातावरणीय अर्थसंकल्प

यंदा बेस्टचा समावेश, भविष्यात इतर प्राधिकरणे आणि मंडळांचाही होणार विचार मुंबई (खास प्रतिनिधी) : पर्यावरण

बीएमसीच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार शैक्षणिक साहित्य

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या साडेतीन लाख

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२,७१,२९५ विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई: राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे

लोकलमधून उडी मारल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

मुंबई : पश्चिम रेल्वेवर असलेल्या मुंबई सेंट्रल स्टेशनवर एका २७ वर्षीय प्रवाशाचा चुकीच्या बाजूला उतरण्याच्या

चर्चगेट स्टेशनवर मोंजिनीस शॉपला आग, प्रवाशांमध्ये खळबळ!

मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकात गुरुवारी सायंकाळी एक भीषण घटना घडली. स्टेशनच्या आत असलेल्या 'मोंजिनीस केक शॉप'

मुंबईत बीकेसीतील सेबी भवनात अजगरांच्या पिलांचा सुळसुळाट

मुंबई : यंदा मान्सूनचे आगमन मे महिन्यातच झाले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. यामुळे जशी