श्रीभालचंद्र ऊर्फ नागडे महाराज हे खरोखरच कोण? हे एक न सुटणारे महान कोडे आहे! त्यांचे भक्त आपापल्या बुद्धिप्रमाणे त्यांना अनेक अवतारात ओळखतात; परंतु त्यांचे विशेष आकर्षण हे आहे की, त्यांचे भक्त अनेक धर्मांचे, जातीचे आणि पंथाचे आहेत. त्यांच्याकडे परभाव नाही. ज्ञानोबांच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘पाणी जसे गायी आणि वाघ पीत असतेवेळी आपला जीवनधर्म सोडत नाही तसेच वृक्ष जसा त्याला लावणारा आणि तोडणारा या दोघांवरही छाया सारखीच करतो.’ तद्वतच श्रीभालचंद्र महाराज त्यांचा भक्त मग तो कोणत्या धर्माचा नि पंथाचा असो किंवा त्यांना त्यावेळी लाथा मारणारा असो, त्यांना दुजेपण माहीत नाही. ते सदा गंगेसारखे पवित्र व हिमालयासारखे विशाल होते! सागरासारखे अथांग व आभाळासारखे असीम होते!! त्यांच्या थोरवीबद्दल लिहायचे तेवढे थोडेच आहे. किती लिहिले तरी शब्द अपुरेच पडतात. वास्तविक भालचंद्र म्हणजे गणपती. संत रामदास म्हणतात, ‘मुळारंभही तोच आणि आरंभही तोच!’ तुकोबा म्हणतात, ‘चंदनाचे हातही चंदन आणि पायही चंदन’ अशी थोर योग्यता बाबांची आहे. ते ब्रह्मानंदी टाळी लागलेले परब्रह्म आहेत! तरी अशा त्या थोर योगमार्तंडाच्या आणि योगियांच्या चरणी अनंत कोटी प्रणिपात असोत!
राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…