अनिल परब मातोश्रीचा खजिनदार

  87

अमरावती : अनिल परब यांच्या घरावर ईडीने छापेमारी केल्यावरून आमदार रवी राणा यांनी परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनिल परब हा मातोश्रीचा खजिनदार आहे. सरकारमधील कलेक्शन करून मातोश्रीवर नोंद ठेवण्याची मोठी जबाबदारी ते पार पाडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हाताशी घेऊन त्यांनी अनेक वाईट काम केली आहेत. आता त्यांच्या पापाचा घडा भरला आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली आहे.


सचिन वाझेच्या माध्यमातून अनिल परब यांनी अनेक कामे करून घेतली. मोठ्या प्रमाणावर एसटी महामंडळात अनिल परबनी भ्रष्टाचार केला, असा आरोपही रवी राणा यांनी केला आहे.


अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा छळ केला. एसटी कर्मचाऱ्यांनी आपली दिवाळीही साजरी केली नाही. त्यांची दिवाळी अंधारात गेली. पाच-सहा महिने त्यांनी आंदोलन केले. पण अनिल परब यांनी उद्धट भाषेत आणि अहंकारातून एसटी कर्मचाऱ्यांचा छळ केला. त्यामुळे दीडशेच्यावर एसटी कामगारांनी आत्महत्या केली. त्या सगळ्यांची बद्दुआ ही अनिल परब यांना लागणार आहे. अनेक कारस्थानं अनिल परबनी राज्यात केली आहेत. या सगळ्यांचा भंडाफोड होणार आणि अनिल परब तुरुंगात जाणार याचे पूर्ण संकेत आहेत, असा दावा रवी राणा यांनी केला.


मराठी माणसांना फसवून आणि मराठी माणसांच्या टाळूवरचे लोणी खाणारा हा अनिल परब गजाआड जाईल. परबानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांचेही कारनामे बाहेर येतील. एवढच काय तर संजय राऊत यांचेही कारनामे उघड होतील, असा आम्हाला विश्वास आहे. निःपक्षपणे ईडी ही कारवाई करेल आणि या भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकेल, असे आमदार रवी राणा म्हणाले.

Comments
Add Comment

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के

अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या

मोठी बातमी! सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १७० पोलिसांना अन्नातून विषबाधा

सोलापूर: सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली.