मुलाने मुलाशी लग्न केले तर कोणी जन्माला कसे येईल?

पाटणा : जर एखाद्या मुलाचे दुसऱ्या मुलाशी लग्न झाले तर कोणी जन्माला येईल का? जर मुलींची संख्या कमी झाली तर मुले कशी जन्माला येणार. मुलांची लग्ने कशी होणार?, असे सवाल उपस्थित करत बिहारचे मुख्यमंत्री यांनी लैंगिकतेच्या विषयावर खळबळजनक वक्तव्य केले.


पाटणा येथील मगध महिला महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी लैंगिकतेच्या विषयावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, आईशिवाय मुलांचा जन्म कसा होईल. आईच जन्मली नाही तर मुले कशी जन्म घेतील. लग्न केले तर मूल होते, मात्र जर हुंड्यासारख्या गोष्टींमध्ये आपण अडकून राहिलो तर मुलांची लग्ने कशी होणार? त्यामुळे या प्रथेला आपण विरोध केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात महिलांच्या मागणीनुसार दारूंबदी केली आहे. त्याचप्रमाणे लग्नातील हुंडाबंदी होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.


मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कार्यक्रमादरम्यान त्यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, आम्ही महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एकही मुलगी शिकण्यासाठी नव्हती. कुणी महिला विद्यार्थीनी महाविद्यालयात आलीच तर सगळेजण उठून तिला पाहत असत. मात्र आता अनेक मुली मेडिकल आणि इंजिनिअरिंगसारखे उच्च शिक्षण घेत आहेत. त्यामुळे मुली प्रगती करत आहेत.


महिलांच्या मागणीप्रमाणे बिहार राज्यात सरकारने दारूबंदी केली आहे. राज्यातील बालविवाह आणि हुंडा याबाबतही कायदे केले आणि त्या प्रथा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मागील वर्षी आणि यंदा यासंदर्भात निर्णय घेतला आहे. लग्नासाठी मुलीकडून हुंडा घेणे हे योग्य आणि कायदेशीर नाही, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा