मुलाने मुलाशी लग्न केले तर कोणी जन्माला कसे येईल?

पाटणा : जर एखाद्या मुलाचे दुसऱ्या मुलाशी लग्न झाले तर कोणी जन्माला येईल का? जर मुलींची संख्या कमी झाली तर मुले कशी जन्माला येणार. मुलांची लग्ने कशी होणार?, असे सवाल उपस्थित करत बिहारचे मुख्यमंत्री यांनी लैंगिकतेच्या विषयावर खळबळजनक वक्तव्य केले.


पाटणा येथील मगध महिला महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी लैंगिकतेच्या विषयावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, आईशिवाय मुलांचा जन्म कसा होईल. आईच जन्मली नाही तर मुले कशी जन्म घेतील. लग्न केले तर मूल होते, मात्र जर हुंड्यासारख्या गोष्टींमध्ये आपण अडकून राहिलो तर मुलांची लग्ने कशी होणार? त्यामुळे या प्रथेला आपण विरोध केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात महिलांच्या मागणीनुसार दारूंबदी केली आहे. त्याचप्रमाणे लग्नातील हुंडाबंदी होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.


मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कार्यक्रमादरम्यान त्यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, आम्ही महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एकही मुलगी शिकण्यासाठी नव्हती. कुणी महिला विद्यार्थीनी महाविद्यालयात आलीच तर सगळेजण उठून तिला पाहत असत. मात्र आता अनेक मुली मेडिकल आणि इंजिनिअरिंगसारखे उच्च शिक्षण घेत आहेत. त्यामुळे मुली प्रगती करत आहेत.


महिलांच्या मागणीप्रमाणे बिहार राज्यात सरकारने दारूबंदी केली आहे. राज्यातील बालविवाह आणि हुंडा याबाबतही कायदे केले आणि त्या प्रथा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मागील वर्षी आणि यंदा यासंदर्भात निर्णय घेतला आहे. लग्नासाठी मुलीकडून हुंडा घेणे हे योग्य आणि कायदेशीर नाही, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत राज्य आणि केंद्र सरकारे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात

अयोध्येत राम मंदिराचे काम पूर्णत्वास! मुख्य मंदिरासह सहा उपमंदिरांचेही काम पूर्ण

अयोध्या : शतकानुशतके चाललेल्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी सर्वात मोठी आनंदवार्ता आली

स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज ‘इक्षक’ ६ नोव्हेंबरला नौदलात होणार सामील

नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज 'इक्षक' ६ नोव्हेंबर रोजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी

मराठा-कुणबी आरक्षण जीआरवर तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या जीआरवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Election Commission : वादग्रस्त 'एसआयआर' मोहीम आता 'या' १२ राज्यांत!

बिहारमधील टीकेनंतरही केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; १२ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांत एसआयआरचा दुसरा

विमानतळावरचे महागडे पदार्थ खरेदी करायचे नसतील तर ट्राय करा ही आयडिया

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल वन (T1) कडे जात असताना एका प्रवासी महिलेनं महागडे पदार्थ खरेदी करण्याआधी